What Bollywood Celebrities Said on Operation Sindoor: भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मंगळवार-बुधवार रात्री १२:३७ वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ४ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या अधिकृत घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी, बॉलिवूड कलाकारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आता स्टार्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रितेश देशमुख-
रितेश देशमुखने एका पोस्टमध्ये भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले- ‘जय हिंद की सेना… भारत माता की जय!!! #ऑपरेशनसिंदूर.’ संरक्षण मंत्रालयाने पुष्टी दिल्यानंतर लगेचच ही पोस्ट आली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील पीओके आणि बहावलपूर भागात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
Jai Hind Ki Sena … भारत माता की जय !!!! #OperationSindoor pic.twitter.com/OtjxdLJskC
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2025
जय हिंद, वंदे मातरम: मधुर भांडारकर
चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी पहाटे ५ वाजता हल्ल्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत.’ एक राष्ट्र म्हणून, आपण सर्वजण एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम्.’ चित्रपट निर्मात्याच्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Our prayers are with our forces. One nation, together we stand. Jai Hind, Vande Mataram. 🇮🇳🙏 pic.twitter.com/IyiOX8hqma
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) May 6, 2025
एक देश, एक मिशन: निमृत कौर-
अभिनेत्री निम्रत कौरनेही यावर प्रतिक्रिया देत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले, ‘आपल्या सैन्यासोबत एकजूट.’ एक देश. एक मिशन. जय हिंद, ऑपरेशन सिंदूर.
View this post on Instagram
ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान १७ दहशतवादी मारले गेले आणि ६० जण जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
ज्यामध्ये कोटली, अहमदपूर शार्किया, मुझफ्फराबाद, मुरीदके आणि फैसलाबाद यासारख्या भागात ठोस हल्ले करण्यात आले. या कारवाईचे वर्णन करताना, लष्कराने जोर देऊन सांगितले की, तणाव वाढू नये म्हणून हे हल्ले काळजीपूर्वक करण्यात आले आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.