State Rain – पावसाबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात राज्यातील काही भागात सुसाट्याचा, वादळी वारा आणि गारपीठसह पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
द्राक्षे, कांद्या, आंबा, तूर, काजू यांचे नुकसान…
दरम्यान, गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळं राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये द्राक्षे, कांद्याचे नुकसान झालेय. तर कोकणाच आंब्याचे मोठे नुकसान झालेय. तसेच गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर महाराष्ट्र, कोकण, प. महाराष्ट्र या ठिकाणी हाता तोंडाशी आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. तसेंच मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुले लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नुकसान भरपाई द्यावी…
एकीकडे अवकाळी पावसाने झोडपून काढले असताना आता दुसरीकडे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी. अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे. जे शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, असे ही शेतकरी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे मुंबईसह कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गध्ये आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, कोल्हापूर, बीड आदी ठिकाणीही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेंच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.