Tricolour rally : सध्या भारत पाकिस्तान युद्ध थांबले आहे. परंतू भारताने पाकिस्तानला धडा शिकवला, याबद्दल सैनिकांचे आभार मानले जात आहे. लष्कराला अभिवादन, त्यांचे कौतूक करण्यासाठी विशेष तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पहलगामधील अतिरेकी भ्याड हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे.
जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसले…
दरम्यान, भारताने केलेल्या कारवाईमुळं अतिरेक्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताचे लष्करी सामर्थ्य जगाला दिसून आले आहे. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या तिरंगा रॅलीमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

क्रूर हल्ल्याचे भारताने प्रत्यूत्तर दिले…
पाकिस्तानने फोन करुन युद्ध थांबविण्याची भारताला विनंती केली. जर युद्द सुरु ठेवले असते तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसला नसता. हा फक्त भारताने ट्रेलर दाखवला. अजून पिक्चर बाकी आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्यूत्तर भारताने दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रॅलीच्या सुरुवातील मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. या रॅलीत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.