मारहाण करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाई करा, मीरा-भाईंदरमधील व्यापारी मनसेविरोधात आक्रमक, नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याचे मनसेने म्हटलं आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले आहेत.

Mira Bhyandar MNS Beating : राज्यात तिसऱ्या भाषेवरुनचा वाद नुकताच थांबला असताना आणि हिंदी सक्तीची जीआर सरकारने रद्द केला आहे. हे घटना ताजी असताना आता मराठी अमराठीवरुन मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा वाद दिसून आला आहे. मीरा भाईंदरमध्ये एका दुकानदाराला मराठी न बोलण्यावरुन राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावरु व्यापारी आक्रमक झाले असून, मनसेविरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये माझ्या दुकानाच्या कॅश काऊंटरजवळ ५ ते ६ मनसैनिक येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागवली. मात्र पाण्याची किती रुपयांची हवी आहे, १० रुपये की २० रुपये असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. मात्र मनसे कार्यकर्ते म्हणाले की, हिंदी नाही तर मराठीत बोल… महाराष्ट्रात व्यापार करायचा  करायाचा असेल तर मराठीच बोलावे लागेल,असंही मनसैनिक म्हणत त्यांनी दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली, दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. शी माहिती त्या व्यापार्‍याने दिली आहे.

व्यापाऱ्यांचा मनसेविरोधात मोर्चा…

दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेैनिकांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर आता मीरा भाईंदरमधील व्यापारी आणि व्यापारी संघटना ह्या मनसेविरोधात आक्रमक झाल्या आहेत. तसेच त्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढत मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. तसेच दुकानातील कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यावरुन आपणाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याचे मनसेने म्हटलं आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News