संरक्षण दलांसोबत राज्य सरकारने घेतला सुरक्षेचा आढावा, संरक्षण दलासोबत अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री

सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदान-प्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.

State Government – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध जरी थांबले असले तरी भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दलासोबत राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात राज्य सरकार संरक्षण दलांसोबत आणखी समन्वयाने काम करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी, भारतीय लष्करातर्फे लेफ्ट. जनरल पवन चढ्ढा, नौदल कमांडर नितेश गर्ग, भारतीय वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल रजत मोहन बैठकीला उपस्थित होते.

संरक्षण दलाला सॅल्युट…

दरम्यान, भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदुर राबविले, ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्वपूर्ण आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची याबरोबरच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्य सरकार आणि संरक्षण दल अधिक समन्वयाने काम करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सायबर सुरक्षेबाबत काळजी घ्यावी लागेल

सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदान-प्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करुया. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News