Nilesh Rane : विधानसेभेत गेल्या चार दिवसांपासून विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक होत सरकारला धारेवर धरताहेत. तर आज विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवरुन शिंदेंच्या सेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. तर राणेंच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधव आणि आमदार रोहित पवार यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे.
भास्कर जाधव, रोहित पवार मैदानात
दरम्यान, आमदार निलेश राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर आक्रमक होत सरकारला जाब विचारला. वीज प्रश्नावरुन निलेश राणे सभागृहात आक्रमक होत सिंधुदुर्गात वीज समस्या आहे, यावर सरकारने तोडगा काढला पाहिजे, असं आमदार निलेश राणे म्हणाले. तसेच महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या कामकाजावर काही सवाल उपस्थित केले. या मुद्द्यावर शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनीही निलेश राणेंच्या मुद्दयाल उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं सगळेच चकीत होऊन सर्वांचा भुवया उंचावल्या.

15 वर्षापासून प्रश्न प्रलंबित…
दुसरीकडे सिंधुदुर्गातील वीज समस्याबाबत निलेश राणेंनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. यात महावितरणमध्ये 90 टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना कामाचे प्रशिक्षणही दिले नाही, असा आरोप निलेश राणेंनी केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून काही कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोणालाच मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप राणेंनी केला. 15 वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्यासाठी रस्ते खोदलेत, पण अद्याप काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे राणे म्हणाले. तर राणेंच्या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे.
बैठक आयोजित करून तोडगा काढू – बोर्डीकर
राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे. तर ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. मात्र या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यावर उत्तर देताना मंत्री मेघना बौर्डिकर म्हणाल्या की, कुडाळ-मालवण वीज प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढला जाईल, असं आश्वासन बोर्डीकरांनी दिले.