भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला आमिर खान याने अलीकडेच त्याच्या पुढील मोठ्या प्रोजेक्टबद्दल एक रोमांचक बातमी शेअर केली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘सितारे ज़मीन पर’च्या रिलीजनंतर, आमिर त्याचा ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरू करण्याचा विचार करत आहे.
विशेष म्हणजे, त्याने असेही सूचित केले आहे, की ही भव्य फिल्म कदाचित त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा प्रोजेक्ट असू शकतो.

राज शमानीसोबत अलीकडे झालेल्या पॉडकास्टमध्ये, आमिर खान याने त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या इच्छेबद्दल सांगितले. काही वेळ विचार केल्यानंतर, त्याने स्पष्ट केले की ती फिल्म ‘महाभारत’ असावी, ही अशी एक कथा आहे, जिला ते नेहमीच जिवंत करायचे स्वप्न पाहत होतो.
आमिर म्हणाला, “ही एक स्तरित कथा आहे, यात भावना आहेत, यात भव्यता आहे. जगात जे काही आहे, ते सगळं महाभारतात आहे.” यावरून दिसून येते की आमिरच्या या महाकाव्याबद्दल किती खोलवर भावना आहेत.
‘महाभारत‘ आमिरचा शेवटचा चित्रपट असेल!
अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की आमिरने ‘महाभारत’ हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो असे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, ‘कदाचित हे केल्यानंतर मला असे वाटेल की माझ्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही. मी यानंतर काहीही करू शकत नाही, कारण या चित्रपटाचा आशय असाच असणार आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘मला आशा आहे की मी काम करत मरेन, पण तुम्ही विचारत असल्याने, हे असे काहीतरी आहे ज्याबद्दल मी विचार करू शकतो. कदाचित यानंतर मला असे वाटेल की, आता मला दुसरे काही करण्याची गरज नाही.’
आमिर स्वतः ‘महाभारत‘मध्ये असणार नाही
आमिरने ‘द हॉलिवूड रिपोर्टर’शीही हा प्रोजेक्ट किती मोठा असेल याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, ‘हा माझ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे आणि कथा स्वतः लिहिण्यास अनेक वर्षे लागतील.’ तो यात काम करेल का असे विचारले असता तो म्हणाला, ‘आपण पाहू की कोणत्या पात्रासाठी कोण योग्य आहे.’ याचा अर्थ असा की तो स्वतः कोणतीही भूमिका करू शकत नाही, परंतु कथेसाठी सर्वोत्तम अभिनेता निवडेल.
‘महाभारत’साठी अनेक दिग्दर्शक लागणार
जेव्हा आमिर खान याला विचारण्यात आले की, तो या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करेल का, तेव्हा त्याने सांगितले की ‘महाभारत’ ही अशी कथा आहे जी एकाच वेळी सांगता येणारी नाही. ही कथा अनेक चित्रपटांमध्ये विभागून सांगावी लागेल. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी एका पेक्षा जास्त दिग्दर्शकांची आवश्यकता भासणार आहे.