ईगल नाशिक टायटन्सने महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात अर्शीन कुलकर्णीने शानदार सुरुवात केली तर शेवटी अथर्व आणि रणजीतने स्फोटक खेळी केली. प्रशांत सोलंकीच्या नेतृत्वाखालील नाशिकने अंतिम सामन्यात रायगड रॉयल्सचा पराभव केला, ज्यांनी प्रथम फलंदाजी करत नाशिकला १९१ धावांचे लक्ष्य दिले होते.
हा विजेतेपदाचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. प्रशांत सोलंकीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश वीर आणि हर्ष मोगवीराने शानदार खेळी करत नाशिक टायटन्ससमोर विजयासाठी रायगड रॉयल्सने १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

सिद्धेश वीरच्या ९९ धावा
सिद्धेशने शानदार खेळी केली, पण त्याचे शतक एका धावेने हुकलं. त्याने ५९ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या. या डावात त्याने ४ षटकार आणि ११ चौकार मारले. हर्षने ३९ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.
कुलकर्णीची शानदार खेळी, अथर्व आणि रणजीतची स्फोटक फलंदाजी
लक्ष्याचा पाठलाग करताना मंदार भंडारी आणि अर्शीन कुलकर्णी आणि मंदार भंडारी यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. भंडारी २८ धावांवर बाद झाला, त्यानंतर साहिल प्रकाश (७) देखील लवकरच बाद झाला. पण दुसऱ्या टोकाला अर्शिनने चांगली फलंदाजी करत ५३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.
शेवटी, सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला जेव्हा रणजीत निकम आणि अथर्व काळे यांनी स्फोटक खेळी केली आणि ईगल नाशिक टायटन्सचा विजय निश्चित केला. रणजीतने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३१ धावा केल्या. अथर्वने ७ चेंडूत २ षटकार आणि तितक्याच चौकारांसह सलग २३ नाबाद धावा काढल्या आणि नाशिकला विजेतेपद मिळवून दिले.
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू सिद्धेश वीर होता, ज्याने ११ सामन्यांमध्ये ५६.२५ च्या सरासरीने ४५० धावा केल्या. त्याने स्पर्धेत १८ षटकार आणि ४६ चौकार मारले. सर्वाधिक विकेट्सबद्दल बोलायचे झाले तर, एमपीएल २०२५ मध्ये तनय संघवीने ११ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या.