रेल्वे प्रवास महागणार, 1 जुलैपासून नवी दरवाढ लागू होण्याची शक्यता, नेमकं काय घडणार?

रेल्वेनं गेल्या पाच वर्षांपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. रेल्वेचा वाढता खर्च आणि देखभालीचा खर्च पाहता हा निर्णय होणं अपेक्षित होतं.

नवी दिल्ली- सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचं टेन्शन वाढणारी बातमी, रेल्वे प्रवास येत्या १ जुलैपासून महागण्याची शक्यता आहे. १ जुलैनंतर नव्यादराने तिकीट विक्री सुरु होईल अशी माहिती आहे. यापूर्वी २०२० साली रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पाच वर्षांनी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

नॉन एसी मेल आणि एक्स्प्रेसच्या तिकीटांत प्रतिकिलोमीटर १ पैसा दरवाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर एसीच्या दरात प्रति किलोनीटर २ पैसे दरवाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वे तिकीट दरवाढीचा का निर्णय?

रेल्वेनं गेल्या पाच वर्षांपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. रेल्वेचा वाढता खर्च आणि देखभालीचा खर्च पाहता हा निर्णय होणं अपेक्षित होतं. मात्र होणारी दरवाढ ही किरोकळ स्वरुपाची असल्यानं याचा फारसा परिणाम प्रवाशांवर होणार नाही, असं सांगण्यात येतंय.

तिकिटाच्या किमतीत किती वाढ होणार?

रेल्वेच्या नॉन एसी मेल आणि एक्सप्रेसच्या तिकीट दरात प्रति किलोमीटर 1 पैसा दरवाढ होणार आहे. तर एसीच्या तिकीट दरात प्रति किलोनीटर दोन पैसे वाढ अपेक्षित आहे.

जर तुम्ही 500 किलोमीटरचा प्रवास करणार असाल, तर अशा स्थितीत नॉन एसीत तिकिटासाठी 5 रुपये जादा तर एसी प्रवासासाठी 10 रुपयेडजादा द्यावे लागणार आहेत.

सगळ्या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होणार का?

सगळ्या रेल्वे प्रवासाची तिकिटं सरसकट महागणार नाहीत. सेंकड क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 500 किमी अंतरापर्यंत कोणतीही भाडेवाढ सूचित करण्यात आली नसल्याची माहिती आहे. म्हणजे 500 किमीच्या आत लहान अंतरावर प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. 500 किमीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच ही किरकोळ दरवाढ लागू होणार आहे.

भारतीय रेल्वेतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. देशातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा हा अत्यंत स्वस्त आणि  चांगला पर्याय असल्याचं मानण्यात येतं.  गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे आणि  रेल्वे स्टेशनांचं रुपडं  पालडण्यासाठीही सरकारनं मोठे कष्ट घेतल्याचं पाहायला मिळालं.  रेल्वे स्टेशन विकसीत करण्यात आली असून अनेक नव्या रेल्वेही सुरु करण्यात आल्यात. अशात पाच वर्षांनी आता भाडेवाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती आहे.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News