देशात अतिवृष्टी होणार, महाराष्ट्र तापणार; हवामान विभागाचा नवा अंदाज

देशातील 23 राज्यांना हवामान विभागाने वादळांसह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, तर महाराष्ट्रात आणि आजुबाजूच्या राज्यांत उष्णता राहणार आहे.

मुंबई: देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र तापला आहे, पारा 45 अंशांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने राज्यातील जनतेची डोकेदुखी वाढणार आहे. कारण हवामान विभागाने आगामी दिवसांतील वातावरणाबाबत आणखी एक नवा अंदाज वर्तवला आहे.

देशातील 23 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

देशात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. एकीकडे देशातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, तर दुसरीकडे 23 राज्यांना अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवघ्या भारतातील वातावरणात सध्या मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे देशातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, तर दुसरीकडे 23 राज्यांना अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तरेतील राज्यांत अतिवृष्टीची शक्यता

उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टबन्समुळे जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये 25 आणि 26 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ही या राज्यांसाठी धोक्याची घंटा आहे. बांग्लादेश आणि आसामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पूर्व भारतात वादळी वारा आणि वि‍जांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, या राज्यांमध्ये पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर पूर्वेतीला काही राज्यांमध्ये वादळं देखील होणार असून, या काळात ताशी 60 ते 70 किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण भारतात सरी बरसणार

दक्षिण भारताना देखील पाऊस झोडपून काढणार आहे. दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आध्र प्रदेश आणि पाँडेचेरी या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र तापणार, पारा आणखी वाढणार!

या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रासाठी मात्र चिंतेची बाब असणार आहे. कारण राज्यातील उष्णतेची लाट आगामी दिवसांत देखील कायम राहण्याचा अंदाज आहे.  उष्णतेचा तडाखा बसणार आहे, आणखी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. राज्यात ब्रम्हपुरीमध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने उन्हापासून संरक्षण करण्याची गरज आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News