Aditya Thackeray – मुंबई आपली आहे आणि आपलीच राहिली पाहिजे, “ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहिली पाहिजे. अनेक उद्योगपती मुंबईत आले आणि त्यांनी मुंबईला आपलं मानलं. तुम्हाला मुंबईत यायचं असेल तर तिचा आदर करा, तुम्ही व्यवसाय करा. माझ्या मुंबादेवीचा आदर करा.” आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबईच्या अस्मितेवर भर दिला. तसेच धारावीतील सर्व नागरिकांना पात्र केलं नाहीतर, त्यांना धारावीत पाऊल ठेवू देणार नाही. असा इशारा आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला दिली आहे. सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आयोजित मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते.
धारावीचा विकास म्हणजे मालकाचा विकास…
दरम्यान, लढाई लढत असताना अनेक केसेस टाकल्या जातील तरीही माघार नाही त्यांच्या छाताडावर पाऊल टाकून लढाई जिंकू, “धारावीचा विकास म्हणजे मालकाचा विकास आहे. त्याचा मालक कोण आहे?” मुख्यमंत्र्यांनी धारावीचा मास्टर प्लॅन मंजूर केला, त्या खोलीमध्ये मुंबई प्रेमी कोणी नव्हते का, मुलुंडचे कोणी होते का? कुर्ल्याचे कोणी होते का? असा सवाल केला. “मग मालकासाठीच मास्टर प्लॅन जाहीर केला ना?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले. “धारावीचा विकास झाला पाहिजे या मताचा मी आहे. हे धारावीचं टेंडर २२ ऑक्टोबर २०२२ रोजी निघालं, तेव्हा ‘भ्रष्टनाथ मिंधे’ने घोटाळा करून सरकार आणलं,” असे ते म्हणाले.

‘कोटेचा’ की ‘खोटेचा’?
“कुर्ल्याचं काय झालं? मदर डेअरीचं काय झालं? तिथले आमदार गुवाहाटीला गेले होते. आता ते ‘भ्रष्टनाथ शिंदे’ला विचारणार आहेत का?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, “हे आमदार कोण आहेत? आमदार ‘कोटेचा’ नाहीत, ‘खोटेचा’ आहेत,” असे म्हणत त्यांनी, “खरं बोलतायत की खोटं बोलतायत? म्हणून यांचं नाव काय ‘कोटेचा’ की ‘खोटेचा’?” असा सवाल केला. त्यांना प्रेमाचं एक पत्र पाठवून, “आता बोलला होतात, त्याचं काय झालं? आता मालकाला विरोध करणार आहेत का?” असे आमदार मिहिर कोटेचा यांचे नाव न घेता ठाकरेंनी टीका केली.