गेल्या काही महिन्यांपासून आयटी कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या कर्मचारी कपातीच्या बातम्यांदरम्यान आता आयटी प्रोफेशनल्ससाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॉग्निझंट (Cognizant) कंपनीने आंध्र प्रदेशात 1500 कोटींचा मोठा गुंतवणूक प्रकल्प जाहीर केला असून, यामध्ये तब्बल 8000 नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
नवीन IT हब कुठे उभारले जाईल?
कॉग्निझंट आपला नवीन भव्य कॅम्पस आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील कपुलुप्पाडा IT हिल्समध्ये उभारणार आहे. हा कॅम्पस 22 एकर जागेवर विस्तारलेला असेल आणि तीन टप्प्यांमध्ये विकसित केला जाईल. राज्याचे IT मंत्री नारा लोकेश यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली आहे आणि सांगितले की, या गुंतवणुकीमुळे आंध्र प्रदेशला ग्लोबल टेक्नोलॉजी डेस्टिनेशन बनवण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल, तसेच लहान शहरांमध्ये डिजिटल कौशल्यविकासालाही चालना मिळेल.

नोकऱ्या कधीपासून सुरू होतील?
कंपनीने सांगितले की, 2026 च्या सुरुवातीपासून एक तात्पुरती सुविधा सुरू करून 800 कर्मचाऱ्यांसह काम सुरू केले जाईल. तर, 2029 च्या सुरुवातीपर्यंत Phase-1 मध्ये स्थायी कॅम्पस उभा केला जाईल.
Cognizant ने आंध्र प्रदेशच का निवडले?
कॉग्निझंटचे CEO एस. रवि कुमार यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये विस्तार करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. येथे असलेल्या प्रतिभावान युवक, भक्कम पायाभूत सुविधा आणि सरकारचे सहकार्य आमच्या निर्णयामागे महत्त्वाचे आहे. त्यांनी हेही सांगितले की, आंध्र प्रदेशाकडे एक भक्कम IT आणि ITES इकोसिस्टम आहे, जे कंपनीच्या वाढीमध्ये आणि डिजिटल इनोव्हेशनमध्ये मोठे योगदान देऊ शकते.
भारत Cognizant साठी एक महत्त्वाचा आधार
कॉग्निझंटच्या एकूण 3,36,300 कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. हा नवीन कॅम्पस कंपनीच्या ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा भाग असेल. हा प्रकल्प केवळ एक IT गुंतवणूक नसून, एक प्रादेशिक बदल घडवणारा टप्पा ठरेल. यामुळे केवळ रोजगारनिर्मितीच होणार नाही, तर विशाखापट्टणमसारखी शहरे ‘डिजिटल इंडिया’ च्या केंद्रस्थानी पोहोचतील. हा पाऊल भारताच्या डिजिटल भविष्याकडे एक मजबूत वाटचाल ठरणार आहे.