हिंदी सक्तीचा पर्याय हवा कशाला? सरकार राजकारण करत आहे, राज ठाकरेंचा सरकारवर प्रहार

आता माझे मनसैनिक हे प्रत्येक शाळेला जाऊन बघणार की हिंदी भाषा शिकवले जाते की नाही? आणि हिंदीचे पुस्तके छापण्यास दिली आहेत. तर त्यामुळे हिंदी भाषा कशी शिकवली जाते ते बघतोच, असा इशारा यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला. माझे राज्य सरकारला आव्हान आहे की, हे तात्काळ थांबवा नाही तर जो काही संघर्ष होईल, त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Raj Thackeray – शाळांमधील हिंदी भाषा सक्तीची यावरुन राज्य सरकारने जीआर जारी केला आहे. पण जीआरमधून फक्त ‘अनिवार्य’ एवढा शब्द काढण्यात आला आहे. म्हणजे तिसरी भाषा हिंदी राहणारच आहे. यावरुन राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत, सरकारवर टीका केली. याबाबत मी पूर्वी सरकारला २ पत्र लिहिली आहेत. आज तिसरं पत्र शाळांना पाठवत आहे. हिंदी भाषा सक्तीचा कशाला हवी. हे फक्त राजकारणासाठी केलं जातंय, असा प्रहार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्याध्यापकांना पत्र पाठवणार…

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत शैक्षणिक धोरणा व्यतिरिक्त मी कुठल्याही विषयावर बोलणार नाही. शैक्षणिक धोरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. हिंदी सक्तीचे नाही मग पुस्तकं छापली जातात, असं सांगितले. पण आम्ही हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलाय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परंतु इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत दोन भाषा सक्तीचे असताना हिंदी भाषेची गरज काय? असा सवाल राज ठाकरे उपस्थित केला. मी याबाबत सर्व शाळातील मुख्याध्यापकांना पत्र पाठवणार आहे. आणि मुख्याध्यापकांना विनंती करणार आहे की, तुम्ही शाळेत हिंदी भाषा शिकवु नका. तुमच्या पाठीमागे आम्ही पाहडासारखे उभे राहू. असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र गिळायचा आहे….

आज हिंदी भाषा सुंदर आहे. पण आमच्या महाराष्ट्रात मराठी शाळात हिंदीची सक्ती कश्यासाठी? असा सवाल राज ठाकरे उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे आहेत. मग गुजरात राज्यात हिंदीची सक्ती का नाही? ते केवळ महाराष्ट्रातच का? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर ती उत्तरेकडच्या काही प्रांतातिल भाषा आहे. ती हिंदी भाषा ही अन्य राज्यात लादली जात नाही. मी एका गुजराती वेबसाईटवरती पण पाहिले. की तिथे हिंदी भाषा याला सक्त विरोध केला आहे. मग ती महाराष्ट्रातवरतीच का लादली जाते, असं राज ठाकरे यांनी केला.


About Author

Astha Sutar

Other Latest News