पीएम किसान योजना: २० वा हप्ता कधी येणार?, पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) सुरू केली होती. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि खर्च कमी करणे हा आहे.

पंतप्रधान मोदींनी याआधी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यादरम्यान या योजनेची १९ वी हप्ता जारी केली होती. आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी २० व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

शेतकऱ्यांना दरवर्षी किती रक्कम दिली जाते?

या योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६,००० रुपये थेट आर्थिक मदत म्हणून देते. हे पैसे २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, आणि डिसेंबर-मार्चमध्ये दिले जातात.

दरम्यान, २० वा हप्ता कधी येणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही. हप्ता वितरित होण्यापूर्वी सरकारकडून याबाबत सूचना जारी केली जाईल.

ई-केवायसी (eKYC) अनिवार्य

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे. OTP आधारित केवायसी न केल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा त्यांना २० व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

तुमचं नाव यादीत आहे का? असं तपासा

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका व गाव निवडा.

Get Report’ वर क्लिक करा.

तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल. यामध्ये आपले नाव तपासा.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News