हिंदी-मराठीवरुन महाभारत, मनसे विरुद्ध भाजपा-शिंदे शिवसेना संघर्ष पेटणार?

या मुद्द्यावरुन मनसे विरुद्ध भाजपा-शिंदे शिवसेना आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झालीय.

मुंबई- पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यावरुन आणि हिंदी भाषेच्या छुप्या सक्तीवरुन मनसे राज्यात चांगलीच आक्रमक झालेली आहे. मनसेनं यात आक्रमक पवित्रा घेत शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवताच कशी हे बघू, असा इशारा देण्यात आलाय. हिंदीच्या विरोधात मनसे स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरुन मनसे आणि भाजपा आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झालीय.

विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी भाषेचा बोर्ड नसण्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानसभवानत षंढ लोकं बसलेले आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केलीय. दुसरीकडे महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही, असं सांगत भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक असल्याचा दावा केलाय.

विधिमंडळाच्या कार्यक्रमात फलकावर मराठी नाही?

संसदेसह राज्यांच्या विधिमंडळ अंदाज समिती परिषदेचा उद्घाटन समारंभ मुंबईत पार पडला. या व्या,सपीठावर इंग्रजी आणि हिंदीत फलक लावण्यात आले होते. महाराष्ट्रात हा कार्यक्रम होत असताना त्यावर मराठीचा उल्लेख का नाही, असा मुद्दा उपस्थित करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानभवनात षंढ लोकं बसले आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केलीय. यावर भाजपा आणि शिंदेंच्या शिवसनेतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जळजळीत शब्दांत प्रतिक्रिया आम्हालाही देता येतात, असा इशारा शिंदेंची शिवसेना आणि भाजपाकडून देण्यात आलाय.

राज्यातला वाद अतार्किक – शेलार

महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून पाचवी ते आठवी पर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली व अन्य पर्याय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा या अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे कट्टर आहोत तसेच विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलीये.

गैरसमजातून सरकारवर टीका – शेलार

हिंदीच्या विषयावरुन राज्यात ज्या चर्चा सुरू आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो काही गैरसमाजातून टीका होत आहेत, लोकशाहीत तेही अभिप्रेत आहेत. काही जण आंदोलनाच्या भूमिकेत आहेत तो त्यांचा स्वाभाविक अधिकार आहे असे सांगत शेलार यांनी हिंदी भाषेविषयी जे समज गैरसज झाले आहेत त्याबाबत जे प्रश्न विचारले जात आहेत ते अवाजवी, अतार्किक आहेत तसेच ते अवास्तव आहेत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.

भाजपा मराठीसाठी कट्टर- शेलार

भाजपा मराठीच्या बाबतीत कट्टर असून विद्यार्थीहिताचे खंदे पुरस्कर्ते आहे. या राज्यात फक्त मराठी भाषेची सक्ती असून अन्य कुठल्याही भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत पाचवी ते आठवी अशी हिंदीची सक्ती होती ती सुध्दा आमच्या सरकारने काढून हिंदी भाषा ऐच्छिक पर्यायी म्हणून उपलब्ध केली. तसेच आता केवळ एक पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय मांडण्यात आला आहे. ज्यामध्ये लवचिकता ठेवण्यात आला असून तो पहिली ते पाचवी या कोणत्या वर्गात ही भाषा शिकवावी याबाबत लवचिकता ठेवण्यात आली आहे.त्यामध्ये सुध्दा 15 भाषांची व्यवस्था करण्यात आली आहे. या भाषा शिकताना उपलब्ध साधने व त्यासाठीचे साहित्य विचार करता हिंदीचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

यासाठी सुध्दा एक मोठा अभ्यास करण्यात आला आहे. शासनाने यासाठी अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट नियुक्त करण्यात आला होता त्या नंतर भाषा आणि शैक्षणिक जगतातील 450 तज्ञांनी याबाबत अभ्यास करुन तयार 1 वर्षे यावर खल करुन त्यांनी केलेला मसूदा हरकती व सूचनांसाठी जनतेत खूला केला होता ज्यावर 3800 हून अधिक हरकती व सूचना आल्या होत्या. त्यांचा अभ्यास केल्यांनतर जो अहवाल सूकाणू समितीने शासनास दिला त्यामध्ये हिंदी ही तिसरी भाषा असण्याबाबत पर्याय खूला केला. सूकाणू समितीच्या शिफारशीनुसार शासनाने तीसरी भाषा म्हणून शासनाने हिंदीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुध्दा तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही तीसरी भाषा आवश्यकतेनुसार तिसरी भाषा अशी शिफारस या धोरणाने केली आहे. जर भाजपाला हिंदी अथवा तिसऱ्या भाषेची सक्ती करायचीच असती तर हे धोरण ठरवतानाच हा पर्याय निवडला असता त्यामुळे आज जे आमच्या हेतूबाबत जे आरोप केले जात आहेत ते अतार्किक आहेत, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

आजपण शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राची मांडणी 1968 साली केली. त्यानंतर 1964 आणि 1966 साली शिक्षण आयोगाचा जो अहवाल आला त्या अहवालामध्ये राष्ट्रीय सामाजिक एकिकरण म्हणून तीसरी भाषा हिंदी शिकली पाहिजे असा आग्रह करण्यात आला होता. त्यामुळे आज जी चर्चा होते आहे ती अवाजवी आहे, असे सांगत ॲड आशिष शेलार यांनी आज जर आपण व्दिभाषा सूत्र स्वीकारले तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही याचे सविस्तर विवेचन केलेसर्व राजकीय आरोपांना जशास तशी उत्तरे नंतर देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News