मागील 24 तासात सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात? हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दुसरीकडे मुसळधार पावसामुळं पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीत पाणी पातळी वाढल्याने एक बोट नदीत अडकली होती. मात्र ही बोट NDRF च्या पथकाच्या मदतीने बोटीला सुखरुप बाहेर काढले. कोकणातील रत्नाकिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि रायगड कुंडलिका नदी इशारा पातळीवर आहे, याबाबत नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Rain – राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातील काही भाग वगळता पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं राज्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळं भिंत कोसळणे, दरड कोसळणे यामुळं काहीजण जखमी झाल्याचीही घटना घडल्या आहेत.

गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

– पालघर 82.2 मि. मी
– रायगड 82.2 मि. मी
– मुंबई शहर 61.2 मि. मी
– ठाणे 59.3 मि. मी
– रत्नागिरी 50.6 मि. मी

जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर…

दुसरीकडे मुसळधार पावसामुळं पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीत पाणी पातळी वाढल्याने एक बोट नदीत अडकली होती. मात्र ही बोट NDRF च्या पथकाच्या मदतीने बोटीला सुखरुप बाहेर काढले. कोकणातील रत्नाकिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि रायगड कुंडलिका नदी इशारा पातळीवर आहे, याबाबत नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील माळीण, ता. आंबेगाव येथे जमिनीला भेगा पडून दरड कोसळली. आदी घटना राज्यात मुसळधार पावसामुळे घडल्या आहेत.

ऑरेंज अलर्ट कुठे?

दरम्यान, राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून ते उद्या 25-06-2025 रात्री 8.30 वाजेपर्यंत 4.2 मीटर उंच लाटांचा इशारा इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसकडून देण्यात आला असून, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News