राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. तरी मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, संपूर्ण दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा मारा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीजवळ वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरणे टाळावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबई-ठाण्यात पावसाची काय स्थिती?
किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरणार?
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून वातावरण उष्ण आणि अंशतः ढगाळ आहे. वसई, बोईसर, डहाणू तसेच जव्हार भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भागांमध्ये संपूर्ण दिवसभर हलक्या पावसाची शक्यता असून, दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम सरी पडू शकतात. कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, संपूर्ण दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा मारा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीजवळ वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार?
सद्यस्थितीला एकूणच राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. कोकण, मुंबई परिसरात पावसाच्या सरी सुरू आहेत. मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात तुरळक स्वरूपाचा कमी – अधिक पाऊस पाहायला मिळत आहे. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कारण पीकांची वाढ होण्यासाठी सद्यस्थितीला पावसाची गरज आहे.