राज्यात गेल्या २४ तासात किती पाऊस? कोकणासह पुणे, सातारा घाटासाठी पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

राज्यात विदर्भ वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सध्या शेतकऱ्यांची पेरणींची लगबग सुरु आहे. सध्या पेरणीसाठी पावसाची अनुकूल परिस्थिती असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

State Rain : राज्यात गेल्या २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमी, पालघर २१.१ मिमी, रत्नागिरी १९.५ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील २४ तासाकरिता सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना आणि सातारा घाट, पुणे घाट येथे भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

२४ तासात किती मृत्यू व जखमी…

दरम्यान, गेल्या २४ तासात विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. तर मुसळधार पावसामुळं म्हणजे पाणी तुंबणे, भिंत खचणे, रस्ता खचणे, वीज पडणे आदी घटनामुळे जखमींची संख्याही वाढली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि कोल्हापूर जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली आहे. तर वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

गेल्या २४ तासात सर्वांधिक पावसाची नोंद कुठे?

– ठाणे १३.६ मि मी
– रायगड २१.७ मि मी
– रत्नागिरी १९.५ मि मी
– सिंधुदुर्ग १९.१ मि मी
– पालघर २१.१ मि मी


About Author

Astha Sutar

Other Latest News