गाड्यांवर HSRP नंबर प्लेट बसवली का? सरकारने दिली मुदतवाढ

गाड्यांवर HSRP नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता सरकारडून यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आल्याने तुम्हाला वेळ मिळणार आहे.

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. आता ही नंबर प्लेट लावण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवली आहे. ती 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे की, ही मुदत अंतिम असून त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

अंतिम मुदतवाढ असल्याची माहिती

बाईक आणि कारला HSRP नंबर प्लेट सक्तीचे केले आहे. या सर्व गाडी मालकांना 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र तिसऱ्यांदा आता यामध्ये मुदतवाड करण्यात आलेली आहे. वाहनांचे नंबर प्लेट बदलून न झाल्यामुळे ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी फक्त 23 लाख वाहनांची नंबर प्लेट बसवण्यात आली आहे 40 लाख वाहन धारकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे मात्र तरीही एक कोटी वाहन धारकांनी अजूनही ऑनलाईन नोंदणी केलेली नाही.अनेक वाहनचालकांनी कंपन्यांकडून या पाट्या मिळण्यास खूप उशीर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच काही फिटमेंट केंद्र सुद्धा बंद झाल्यामुळे होणारा पुरवठा हा खूप धीम्या गतीने चालू आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत वाढ केली आहे.

HSRP नंबर प्लेटचे महत्व

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News