मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ होतेय? मग ‘या’ सोप्या टीप्स वापरुन पाहा…

मिरची कापल्यानंतरआपल्या हाताची किंवा त्वचेची होणारी जळजळ शांत करण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही वापरून शकता

हिरव्या मिरच्यांची चव प्रत्येक गोष्टीची चव वाढवते. पण हिरव्या मिरच्या कापणाऱ्यालाच त्या कापताना हातांमध्ये होणारी जळजळ कळते. बऱ्याचदा आपल्याला भरपूर हिरव्या मिरच्या कापाव्या लागतात. पण जिभेची चव घेत असताना हातांना त्रास होतो. हिरव्या मिरच्या कापल्याने बहुतेक लोकांचे हात जळू लागतात. हिरव्या मिरच्यांमुळे होणारी जळजळ टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स अवलंबू शकता…

कोरफडीचे जेल लावा

मिरची कापताना जळजळ होत असेल, तर तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता. मिरच्या कापल्यानंतर हातावर कोरफडीचे जेल लावा आणि थोडा वेळ (5 मिनिटे) मसाज करा. त्यानंतर, हात पाण्याने धुवून घ्या. तुम्हाला जळजळ होण्यापासून आराम मिळेल आणि तुमची त्वचा देखील मऊ होईल.

दुधाची मलाई

मिरची कापल्यावर होणारी जळजळ कमी करण्यासाठी दुधाची मलाई लावणे हा एक चांगला उपाय आहे. मलाई लावल्याने जळजळ लवकर कमी होते. दुधातील नैसर्गिक गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात. दूध किंवा दही लावल्याने जळजळ कमी होते.

मध

मधामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म आहेत. जळजळ होत असेल, तर हाताला मध लावा. त्यामुळे मिरच्या कापल्यास हाताला जळजळ झाल्यास हाताला मध लावावा. मध लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो, ज्यामुळे जळजळ कमी होते. 

ठंड पाणी

जळजळ होत असेल तर बर्फाचे पाणी किंवा गार पाणी एका भांड्यात घेऊन त्यात हात बुडवून ठेवा. यामुळे लवकर आराम मिळतो. जळजळ कमी करण्यासाठी थोडा वेळ बर्फ हातांवर चोळा. 

दही

जळजळ कमी करण्यासाठी दूध किंवा दही हाताला लावा. दही लावल्याने जळजळ लगेच कमी होते. दही त्वचेला शांत करते आणि जळजळ कमी करते. दही त्वचेला आवश्यक पोषण पुरवते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News