श्रावण महिन्यातील ब्रह्म मुहूर्तात करा ‘हे’ उपाय, पूर्ण होतील सर्व मनोकामना

ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा काळ. हा काळ अध्यात्मासाठी, तसेच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात केलेली उपासना फलदायी ठरते, तसेच शरीर आणि मन शांत राहते.

हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात भगवान शिवाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. जो व्यक्ती या महिन्यात भोलेनाथाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व संकटे दूर होतात. भोलेनाथाची पूजा नेहमीच फायदेशीर असली तरी, श्रावण महिन्यामध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी काही विशेष उपाय केले तर फायदेशीर परिणाम मिळू शकतात.

श्रावण आणि ब्रह्म मुहूर्ताचे महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिना जितका महत्त्वाचा आहे तितकाच ब्रह्म मुहूर्त देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. असे म्हटले जाते की या वेळी देवी-देवता पृथ्वीवर येतात. या वेळी पूजा, पाठ, तपस्या आणि प्रार्थना केल्यास शुभ फळे मिळतात. श्रावण महिन्यात ब्रह्म मुहूर्तावर केलेली शंकराची पूजा आणि नामस्मरण विशेष फलदायी ठरते. असे मानले जाते की, या काळात केलेली उपासना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. 

ब्रह्म मुहूर्त कधी असतो?

ब्रह्म मुहूर्त हा सूर्योदयापूर्वीचा काळ असतो. साधारणपणे, हा काळ पहाटे 4 ते 5:30 च्या दरम्यान असतो. हा काळ ऋतूनुसार बदलतो, त्यामुळे सूर्योदयाची वेळ पाहून ब्रह्म मुहूर्ताची वेळ निश्चित करावी. ब्रह्म मुहूर्ताचा कालावधी 48 मिनिटांचा असतो. हा काळ दिवसातील सर्वात शुभ आणि सकारात्मक मानला जातो, कारण या वेळी ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन करण्यासाठी खूप चांगला असतो. 

कराग्रे वसते लक्ष्मी

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या तळहातांकडे पाहा आणि ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितो ब्रह्मा, प्रभाते करदर्शनम’ हा श्लोक म्हणा. याचा अर्थ असा की, हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी ब्रह्मा वास करतात. त्यामुळे सकाळी तळहातांचे दर्शन घेतल्याने लक्ष्मी, सरस्वती आणि ब्रह्मा यांचा आशीर्वाद मिळतो.

इष्टदेवतेची पूजा

जो माणूस ब्रह्म मुहूर्तावर उठतो, स्नान करतो, योगासनात बसतो आणि आपल्या इष्टदेवतेची पूजा करतो, त्याला अनेक फायदे मिळतात. ह्या सवयींमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे मिळतात. ब्रह्म मुहूर्तावर पूजा केल्याने आध्यात्मिक संबंध दृढ होतो.

गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप

श्रावण महिन्यात ब्रह्म मुहूर्तावर गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. गायत्री मंत्र हा मंत्र ज्ञान आणि बुद्धीसाठी जपला जातो. या मंत्राचा जप केल्याने एकाग्रता वाढते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते. महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्यासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी जपला जातो. या मंत्राचा जप केल्याने भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय मानला जातो. त्यामुळे या महिन्यात या मंत्रांचा जप केल्याने विशेष शुभ फळे मिळतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News