पंजाब-मुंबई क्वालिफायर-२ सामना पावसामुळे रद्द झाला, तर फायनलमध्ये कोण पोहोचेल? IPL चे नियम समजून घ्या

PL २०२५ चा क्वालिफायर-२ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात पावसाची शक्यता कमी आहे.

MI vs PBKS Qualifier-2 :  आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत क्वालिफायर-२ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध क्वालिफायर-१ मध्ये पराभव झाल्यानंतर पंजाब किंग्जला आता क्वालिफायर-२ मध्ये मुंबईला भिडावे लागणार आहे. क्वालिफायर-२ मध्ये पंजाब आणि मुंबई यांच्यात जो संघ जिंकेल, तो संघ RCB विरुद्ध IPL २०२५ च्या अंतिम सामन्यात खेळेल.

मुंबई-पंजाब सामन्यात पाऊस झाला तर काय होईल?

IPL २०२५ चा क्वालिफायर-२ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात पावसाची शक्यता कमी आहे. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर IPL च्या नियमांनुसार, लीग स्टेजमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये वर असलेली टीम थेट फायनलमध्ये पोहोचेल. पंजाबने १९ पॉइंट्ससह टॉप स्थान पटकावले होते, तर मुंबईकडे १६ पॉइंट्स होते आणि ती चौथ्या क्रमांकावर होती. त्यामुळे जर सामना रद्द झाला, तर पंजाबचा थेट फायनलमध्ये प्रवेश होईल.

क्वालिफायर-२ साठी अतिरिक्त वेळ

मुंबई आणि पंजाबमधील सामन्यात जर पावसाने थोडा वेळ अडथळा आणला, तर IPL प्लेऑफसाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा (२ तास) वेळ राखून ठेवला जातो. त्यामुळे उशिरा सामना सुरू झाला तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण सामना पूर्णपणे रद्द झाल्यास यासाठी कोणताही रिजर्व डे ठेवलेला नाही.

क्वालिफायर-२ कधी आणि कुठे?

IPL २०२५ चा क्वालिफायर-२ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता खेळवला जाईल. त्यानंतर ३ जूनला अंतिम सामना देखील याच मैदानावर होणार आहे. आधी IPL फायनल कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार होता, पण भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे तो अहमदाबादला हलवण्यात आला आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News