State Rain – 25 आणि 26 मे रोजी राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. हा पाऊस सरासरीपेक्षा ११ पट जास्त असल्याचे हवामाने विभागने म्हटले आहे. मे महिन्यात सरासरी पेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळं धरण आणि नदीमध्ये जलसाठा वाढला . उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला. मात्र गेल्या आ़वड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
पुढील चार दिवस काय स्थिती?
दरम्यान, गेल्या आ़वड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, पुढील तीन चार दिवस राज्यातील विविध भागात म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये १ ते ४ जूनदरम्यान मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस बरसणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

सरासरीपेक्षा ११ पट जास्त पाऊस…
यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९१८ मध्ये मे महिन्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु, विशेष म्हणजे मे महिना हा उन्हाळाच महिना म्हणून ओळखले जाते. पण मे महिन्यात सरासरी पेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळं हा एक नवीन विक्रम आहे.