विजय मल्ल्याने आरसीबीचं अभिनंद केलं, लोकांनी मागितले पैसे

आरसीबीच्या विजयाबद्दल अभिनंदन करणे विजय मल्ल्याला महागात पडले. लोकांनी मल्ल्याकडून देशाचे पैसे मागण्यास सुरुवात केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. बंगळुरूने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल आरसीबीचे पूर्वीचे मालक विजय मल्ल्या यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
विजय मल्ल्या यांनी संपूर्ण संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. विजय मल्ल्याने त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘ई साला कप नाम दे’, जी आरसीबीची टॅगलाइन आहे.

विजय मल्ल्याच्या पोस्टमध्ये काय?

विजय मल्ल्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की ‘रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू अखेर १८ वर्षांनंतर आयपीएल चॅम्पियन बनला आहे. २०२५ ची ही आयपीएल स्पर्धा आरसीबीसाठी खूप चांगली होती’. विजय मल्ल्याने पुढे लिहिले की ‘उत्कृष्ट कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ असलेल्या संतुलित संघाने धाडसी खेळ केला आहे. खूप खूप अभिनंदन! ई साला कप नाम दे’.

लोकांनी विजय मल्ल्याला पैसे मागितले

आरसीबीच्या विजयाबद्दल अभिनंदन करणे विजय मल्ल्याला महागात पडले. लोकांनी मल्ल्याकडून देशाचे पैसे मागण्यास सुरुवात केली. विजय मल्ल्या यानेही बंगळुरूला क्वालिफायर-१ मध्ये पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यानंतरही सोशल मीडियावर लोकांनी पैसे दिल्याबद्दल विजय मल्ल्याला ट्रोल केले.

आरसीबीने जिंकले पहिले विजेतेपद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिले आयपीएल जेतेपद जिंकले आहे. संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली बंगळुरूच्या विजयावर खूप भावनिक दिसत होता. आरसीबीने या १८ व्या हंगामात विजय मिळवल्याबद्दल विराट मैदानातच रडू लागला. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच विराट या संघासोबत आहे आणि ३ जूनच्या रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिले विजेतेपद जिंकले.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News