पावसाळा सुरू झाला आहे. अनेकांना पाऊस खूप आवडतो. कडक उन्हानंतर पावसाचे आगमन लोकांना खूप दिलासा देते. या ऋतूत अनेक प्रकारचे पदार्थ खावेसे वाटतात. पावसाळ्यातील थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. पावसाच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी, पावसाच्या दिवसात कोणत्या गोष्टी खाणं टाळावं हे जाणून घेऊया…
दही
पावसाळ्यात दही खाणं टाळण्याची अनेक कारणं आहेत. दही थंड आणि चिकट असल्यामुळे पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर श्वसन समस्या वाढू शकतात. पावसाळ्यात वातावरणातील बदल आणि जास्त ओलावा यामुळे सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते. दही थंड असल्यामुळे ते शरीरात सर्दी-खोकला वाढवतो. दही पचनासाठी चांगले मानले जात असले तरी, पावसाळ्यात ते पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या येऊ शकतात.

हिरव्या पालेभाज्या
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे. पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये कीटक आणि जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. तसेच, पावसाळ्यामुळे वातावरणातील ओलावा वाढतो, ज्यामुळे पालेभाज्यांमध्ये जंतू आणि विषाणू वाढू शकतात. पावसाळ्यात कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे पालेभाज्या दूषित होऊ शकतात.
मांसाहारी पदार्थ
बाहेरचे अन्न
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)