भारतात WTC फायनल कुठे खेळवता येईल? रवी शास्त्री यांनी घेतले या स्टेडियमचे नाव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे आतापर्यंत तीन सीझन खेळवले गेले आहेत. आतापर्यंत सर्व WTC फायनल इंग्लंडमध्ये खेळल्या गेल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसीला एक सूचना दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जागतिक स्पर्धा भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मोठ्या स्टेडियममध्ये झाल्या तर त्या अधिक लोकप्रिय होतील. सोबतच त्यांनी यासाठी दोन स्टेडियमची नावेही सुचवली आहेत, जिथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवता येईल.

 रवी शास्त्री काय म्हणाले?

रवी शास्त्री यांनी विस्डेन क्रिकेट पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, ‘मला वाटतं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी एक उत्तम ठिकाण असू शकतं. अहमदाबाद हे WTC फायनलसाठी देखील एक उत्तम ठिकाण असू शकते”. ते पुढे म्हणाले की मुळात, अशी जागा जिथे तुम्ही गर्दी आकर्षित करू शकता. कारण लॉर्ड्स हे १,००,००० आसनक्षमतेचे स्टेडियम नाही. त्यामुळे कोणताही संघ खेळत असला तरी, तुम्हाला चांगली प्रेक्षकसंख्या मिळेल हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही अंतिम सामना मोठ्या स्टेडियममध्ये आयोजित करावा.

WTC २०२५ चा अंतिम सामना लॉर्ड्स येथे खेळला गेला

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या चक्राचा अंतिम सामना साउथहॅम्प्टनमधील रोझ बाउल स्टेडियमवर झाला, जिथे न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. यानंतर, WTC च्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना ओव्हल येथे खेळला गेला, जिथे ऑस्ट्रेलियन संघ भारताला हरवून विजेता ठरला. तिसऱ्या फेरीचा अंतिम सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला, जिथे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवले. २०३१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत इंग्लंडकडे यजमानपदाचे अधिकार आहेत. २०३१ नंतरच WTC फायनल इतर कोणत्याही देशात आयोजित करता येईल.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News