‘एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी’; उद्धव ठाकरेंकडून मनसे-शिवसेनेच्या एकत्रित वाटचालीचे संकेत

मुंबईतील विजयी सभेतून उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठी माणसाला एकतेचा संदेश दिला.

हिंदी सक्तीला केलेल्या कडाडून विरोधानंतर सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे गरजले. उद्धव ठाकरेंनी मराठी जणांना एकतेचा संदेश दिला. तसेच मनसे-शिवसेना युतीचे संकेत दिले. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हटले? पाहूयात…

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘ आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आज आपल्या भाषणाची सुरूवात केली. त्यामुळे आगामी काळात ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्रित वाटचाल करतील असे संकेत मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकरेंच्या राजकीय एकत्रित येण्याला हवा मिळाली.  यावेळी आक्रमक भाषण करताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अणाजी पंत’ असा उल्लेख केला.

आम्ही फडणवीसांमुळे एकत्र, राज ठाकरेंचा टोला

विजयी सभेतील भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “आम्ही देवेंद्र फडणवीसांमुळे एकत्र आलो. इतर कोणतेही मुद्दे आम्हाला एकत्र आणू शकले नव्हते.” असं राज ठाकरेंनी म्हटले. शिवाय, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारला घेरलं. महाराष्ट्र आणि मराठीवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. थोडक्यात दोन्ही ठाकरेंनी आज फडणवीलांना विशेष लक्ष्य केले.

ठाकरे बंधुंची सभा यशस्वी ठरली!

हिंदी सक्तीला केलेल्या कडाडून विरोधानंतर सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडतो आहे.  राज ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करत आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मराठी माणूस मुंबईत दाखल झाला असून वरळी डोम आणि परिसरात तोबा गर्दीचे चित्र आहे. ठाकरेंना ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत. आजच्या मेळाव्यातून मराठी माणसाला नेमकी काय दिशा मिळते, शिवाय कोणता कानमंत्र मिळतो…हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News