India Pakistan War – काश्मीरमधील पहेलगाम येथील अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सेंदूर करत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानीने हवाई हल्ले केले. याला भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाकिस्तान पुरता घाबरला आहे.
पाकस्तानमध्ये कर्फ्यू लागू…
दरम्यान, भारताने ११ ठिकाणी पाकिस्तानमध्ये हल्ला केले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाकिस्तानात सध्या कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मदतीसाठी अन्य देशाकडे याचना केली आहे. तसेच त्यांना सुरक्षेसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. दरम्यान पाकिस्तान सैन्यात घबराट झाली असून, काही सैन्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांना हटविण्यात आले आहे. भारताने मिसाईल हल्ले केले आहेत. तसेच ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यानंतर भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

परिस्थितीवर नियंत्रण आणा…
दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची या ठिकाणी भारताने हल्ले केला. यानंतर मदतीसाठी पाकचे पंतप्रधान यांनी अन्य देशांना फोन केले. रात्री नेटवर्क ही गेले होते. तर अमेरिकेने म्हटले की, परिस्थिती अधिक चिघळू देऊ नका. परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे दोन्ही देशांना संदेश दिला आहे. पाकिस्तनच्या पंजाबमधील लोकांना घरातच रहा…, घराबाहेर पडू नका…लाईट आणि खिडक्या बंद करून घरातच राहण्याचं पाकिस्तान पंजाबमधील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.