सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; पंढरपूर शहरात पावसामुळे नागरिकांची धावपळ

पावासाला आता पुन्हा सुरूवात झाली आहे. पावसाने पंढरपूर शहर आणि परिसरात कमबॅक केलं आहे. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसतोय.

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती, सोलापूर जिल्ह्यात पावसाने गेली काही दिवस उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर आता पावसाने पंढरपूर शहर आणि परिसरात कमबॅक केलं आहे. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसतोय. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

13 जूनला मान्सून पुन्हा सक्रिय?

पावासाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावर्षी पावसाने वेळेआधी लवकर हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली होती. २६ मे रोजी मुंबई, उपनगर, गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल झाला होता. असा दावा हमानान विभागने केला आहे. पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आता पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. तर राज्यात 13 जूनपासून मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पाऊस कुठे बरसणार?

राज्यातील अनेक भागात मे महिन्यात हजेरी लावत १२४ वर्षात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे हा एक पावसाने रेकॉर्ड केला होता. अनेक वर्ष्यानंतर मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याची नोंद झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी दिल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दुसरीकडे शेतकरी पेरणीसाठी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे. मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे, असा अंदाज लावला जात आहे. राज्यात मे महिन्यात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला. १२४ वर्षांतील सर्वांत ओला महिना म्हणून नोंद झाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News