India Pakistan War : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ९ अतिरेक्यांनी ठिकाणी उद्वस्त केली आहे. यात २६ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला तिथे ९०० अतिरेकी हजर असल्याची माहिती समोर येत आहे. भारताने इयर स्ट्राईक करुन भारताने पाकला चोख प्रतिउत्तर दिले आहे. दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी ९ तळं उद्वस्त केली आहेत.
भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय जमीनदोस्त केलं आहे. भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही नागरिकांना मारलं नाही.

लश्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर नष्ट…
दरम्यान, अवघ्या २३ मिनिटात भारताने ही मोहिम फत्ते केली आहे. मात्र या मोहिमेसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून भारताची तयारी सुरु होता. भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये असलेल्या लश्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर जमीनदोस्त केलं आहे. पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली, यात ९ अतिरेक्यांचा खात्मा झाला असून, यात १०० अतिरेकांच्या मृत्यू झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांचे प्रशिक्षण, मसूद अझहर मदरसा बेचिराख
तसेच भारताने हा हल्ला पीओकेच्या मुरीदके येथे हल्ला केला आहे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. दरम्यान, मुंबईवरील २००८ साली हल्ला झाला होता. त्या हल्लाचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात होते. ‘Operation Sindoor’च्या हवाई हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचं दहशतवादी लपण्याचं ठिकाण मरकज-ए-तौयबा उडवून देण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, जैशचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहरचे जन्मगाव असलेल्या बहावलपूरवर हल्ला केला आहे. अझहरच्या मदरशावर गोळे पडल्याने मदरसे जळत असल्याचे फोटोतून दिसत आहे.
लष्कर-ए-तैयबाची ९ ठिकाणं उद्धस्त…
भारताने ‘Operation Sindoor’च्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेवरील ९ ठिकाणी बेचिराख केली आहेत. यात गुलपुर, भींबर, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, चक अमरू, बाघ, कोटली, आणि मुजफ्फराबाद अशा ९ ठिकाणांवर हल्ला केला.