भारत भ्रमंतीचं स्वप्न फक्त 100 रूपयांत होईल साकार; कसं? ते जाणून घ्या सविस्तर

जागृती यात्रेच्या माध्यमातून तुम्हाला भारत भ्रमंतीची उत्तम संधी मिळू शकते. गेल्या 17 वर्षांपासून ही ट्रेन नियमितपणे वर्षातून एकदा चालवली जाते, मात्र तरीही अजूनही अनेकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. दरवेळी सुमारे 500 प्रवाशांना या अद्वितीय अनुभवाचा भाग होता येतो.

जर तुम्हालाही अवघ्या 100 रुपयांमध्ये संपूर्ण भारतदर्शन करण्याची संधी मिळाली, तर? जागृती यात्रा नावाची एक खास ट्रेन दरवर्षी देशभरातील तरुणांना भारताची विविध रूपं दाखवत उद्योजकतेचं प्रशिक्षण देण्याचं काम करते. गेल्या 17 वर्षांपासून ही ट्रेन नियमितपणे चालवली जाते, मात्र तरीही अजूनही अनेकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. दरवेळी सुमारे 500 प्रवाशांना या अद्वितीय अनुभवाचा भाग होता येतो. फक्त 100 रुपयांत भारतदर्शन घडवणाऱ्या या ट्रेनचं नाव आहे जागृती यात्रा. या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे – “उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचा सर्वांगीण विकास घडवणे.”

भारत भ्रमंतीचं स्वप्न होईल साकार

भारत असो किंवा परदेश… प्रवास करायला कोणाला नाही आवडत? रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही दिवस विश्रांती घेऊन नवीन ठिकाणी फिरायला जाणं ही एक वेगळीच अनुभूती असते. मात्र सध्याच्या काळात प्रवासाचा खर्च प्रचंड वाढला आहे, त्यामुळे वेळ आणि पैशाच्या अभावामुळे अनेकांची स्वप्नं अधुरीच राहतात.

2025चे नियोजन कसे?

जागृती एक्सप्रेस दिल्लीहून सुरू होते आणि खालील प्रमुख ठिकाणांवरून प्रवास करते. अहमदाबाद,मुंबई,बेंगळुरू,मदुराई,ओडिशा,मध्य भारत आणि शेवटी पुन्हा दिल्ली येथे समारोप होतो. या अनोख्या प्रवासासाठी 21 ते 27 वयोगटातील तरुण-तरुणी पात्र आहेत. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना प्रवासाची संधी दिली जात नाही. 15 दिवसांचा हा प्रवास सुमारे 8,000 किमी इतका आहे. या काळात प्रवाशांना भारतदर्शनासोबतच उद्योजकतेबद्दल शिकवले जाते, प्रेरणादायी व्याख्याने, कार्यशाळा आणि विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. ज्यांना वाटतं की ही ट्रेन हवी तेव्हा बुक करता येईल, त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. जागृती यात्रा दरवर्षी फक्त एकदाच आयोजित केली जाते. अर्ज प्रक्रिया मे महिन्यात सुरू होते, तर प्रवास नोव्हेंबर महिन्यात असतो.

प्रारंभ: 7 नोव्हेंबर 2025 , समारोप: 22 नोव्हेंबर 2025 असे यंदाचे  नियोजन असणार आहे. www.jagritiyatra.com या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. अर्जात काही विचारमूल्य प्रश्न विचारले जातात – सामाजिक जाणीव, तुमची भूमिका, दृष्टिकोन यावर आधारित. फोन किंवा व्हिडिओ इंटरव्ह्यूही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अवघ्या भारताची भ्रमंती करायची असेल आणि तीही अवघ्या 100 रूपयांत…तर तुम्ही या प्रक्रियेसाठी नोंदणी करून पुढे जाऊ शकता. आणि जागृती यात्रेचा भाग होऊ शकता.


About Author

Rohit Shinde

Other Latest News