Mumbai – लोकसभा विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर शंका घेणार लेख लिहिला. तसेच याबाबत त्यांनी भारत निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. या लेखावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आता भाजपाचा हा एकतर्फी विजय मिळवाला आहे, विधानसभा निवडणुकीत विजय भाजपाने हायजॅक केला. अशी टिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मतदान केंद्रावर ज्याला सेटिंग्ज झाले…
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सेटिंग्ज केले. यावर राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत. भूमिका मांडली आहे. त्यामुळं देशात आणि जगात लोकशाही माननाऱ्या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील जनतेला कळलंय की, भाजपाची कंपनी कशाप्रकारे निवडणूका जिंकतात हे सिद्ध झालंय. राहुल गांधी खोटे बोलत, नाहीतर खोटे बोलण्यात मोदींना नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे, ते सातत्याने खोटे बोलतात. भाजपाने विधानसभा निवडणुकीत २५ जागा जिंकू शकत नव्हते. एकनाथ शिंदेंच्या १०-१५ जागा येऊ शकतात. अजित पवारही त्याच रेंजमध्ये होते. पण निवडणूक आयोगाने यांना तिन्ही पक्षांना विजयाचे जागांचे वाटप केले. अशी बोचरी टिका राऊतांनी केली.

सहा महिन्यात असं काय घडलं?
राहुल गांधी ही संवैधानिक पदावर आहेत. राहुल गांधींचा लेख देशातील जनतेपर्यंत पोहचला आहे. म्हणून भाजपाचा तिळपापड झालाय. त्यांचा खोटा चेहरा समोर आला आहे. जरी यावर देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहावा. पण भाजापाच्या विरोधात वातावरण असताना आणि महाविकास आघाडी जिंकेल असं वाटत असताना, गेल्या 6 महिन्यात असं काय घडलं? की भाजपाचा एकतर्फी विजय मिळाला?, त्यामुळं विधानसभेची निवडणूक झालीच नाही. भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली, असा आरोप संजय राऊतांनी केला.