मुंबई – महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंग हा राहुल गांधींचा आरोप हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीसांनी दिलीय. राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करत असल्याचं प्रत्युत्तरही फडणवीसांनी दिलंय. लोकशाही प्रक्रिया आणि घटनात्मक संस्थांबाबत शंका उपस्थित करुन राहुल गांधी कोणतं विष कालवत आहेत, असा सवालही फडणवीसांनी केलाय.
महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅचफिक्सिंग असून, बिहारसह इतर राज्यांच्या निवडणुकांतही हेच घडणार असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग, मतदार आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी यावर प्रश्न उपस्थित करणारा लेख लिहिला होता. राहुल गांधींच्या या आरोपांना उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहूनच दिलंय.

राहुल गांधी विरुद्ध फडणवीस
राहुल गांधींचा आक्षेप
१. निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, सरन्यायाधीशांना हटवून केंद्रीय मंत्र्याचा समावेश
देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
१. 19050 पासून नवा कायदा अस्तित्वात येईपर्यंत 26 पैकी 25 निवडणूकआयुक्त काँग्रेसेनं थेट नेमले
—
राहुल गांधींचा आक्षेप
2. 2019 च्या निवडणुकीतील मतदारांची संख्या 8.98 कोटींवरुन पाच वर्षांत 9.70 कोटी, यातील 41 लाख मतदार पाच महिन्यांत वाढले
देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
2. 2004 ते 2009 या काळात 1 कोटी मतदार वाढ, 2009 ते 2014 काळात 75 लाख नवे मतदार, 2024 मध्ये नवे काही घडले नाही
—
राहुल गांधींचा आक्षेप
3. मतदान संपलं तेव्हा मतदानाची टक्केवारी 58.22 होती, ती दुसऱ्या दिवशी सकाळी 66.5 टक्के झाली. 7.83 टक्के मतदानाची अचानक वाढ
देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
3. टक्केवारी वाढल्याचा आरोप हस्यास्पद, लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 60.96 वरुन 66.71 टक्के झाली. तुमचा विजय झाला टक्केवारी लपवायची का?
—
राहुल गांधींचा आक्षेप
4. 85 विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त मतदान झाल्याचा संशय, कामठी मतदारसंघात भाजपाचे विधानसभेसाठीचे मतदान 56 हजारांनी वाढले.
देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
4. माढा मतदारसंघात 18 टक्क्यांची वाढ- शरद पवार राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी, वणीत 13 टक्के वाढ- ठाकरे शिवसेना विजयी, संगमनेर 12 टक्के वाढ- काँग्रेस विजयी
—
राहुल गांधींचा आक्षेप
5. पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला. आयोगानं सीसीटीव्ही आणि इलेक्टॉनिक रेकॉर्ड जनतेपर्यंत पोहचू दिले नाहीत.
देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
5. लोकशाही प्रक्रिया, जनादेशाचा अपमान, जनतेला नाकारत आहेत, काँग्रेस अजून गर्तेत जाईल
मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीत विषासमान असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती, यावर घटनात्मक संस्थांवर शंका व्यक्त करन राहुल गांधी कोणते विष कालवत आहेत, असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय. सत्य आणि संख्येच्या आधारावर उत्तरं दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर गोंधळलेल्या अवस्थेत निवडणूक आयोगाच्या वतीनं फडणवीसांनी उत्तरं दिल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतलाय.
निवडणूक आयोग विरुद्ध राहुल गांधी
राहुल गांधींनी व्यक्त केलेले आक्षेप निवडणूक आयोगानंही खोडून काढलेत.
निवडणूक आयोगाचं काय स्पष्टीकरण?
1. राहुल गांधी यांच्या खोट्या आक्षेपानं लोकप्रतिनिधींची बदनामी
2. लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या उत्साहावर परिणाम
3. मतदानाची प्रक्रिया सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत पारदर्शक पद्धतीने
4. निकाल बाजूने लागला नाही तर आयोगाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न चुकीचा
निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींनी आयोगाला नवं आव्हान दिलंय.
राहुल गांधींचं आव्हान
१. जर तुमच्याकडे लपवण्यासारखं काही नसेल तर देशातील मतदार याद्या जाहीर करा
२. संध्याकाळी पाचनंतरचं मतादनं केंद्रावीरल सीसीटीव्ही फुटेजही जारी करा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर असताना राहुल गांधी यांनी केलेल्या या मॅचफिक्सिंग आरोपामुळे नवा नरेटिव्ह तयार करण्यात येत असल्याचं महायुतीचं म्हणणं आहे. मतदार संख्या, मतदान टक्केवारीवर आक्षेप घेत राहुल गांधींनी नवा मुद्दा उपस्थित केलाय, आता हा मुद्दा आगामी निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे.