विरोधक “या” प्रश्नावरुन आक्रमक होण्याची शक्यता, पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत? 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Monsoon Session : अधिवेशनाची तयारी आणि नियोजनासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठक शुक्रवारी पडली. राज्य सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवारी 30 जून) होत आहे. हे अधिवेशन 30 जून ते 18 जुलै पर्यंत चालणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. अशी माहिती विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी दिली आहे. तर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

चहापानवर विरोधकांचा बहिष्कार…

दुसरीकडे उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तर आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांयकाळी सत्ताधारी पक्षाकडून परंपरेनुसार चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकला आहे. उद्यापासून सभागृहात कोणकोणते मुद्दे मांडायचे, राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन सरकारला कसे घेरायचे, सरकारने दिलेल्या आश्वासनचा जाब विचारण्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.

विविध मुद्दयावरुन विरोधक घेरण्याच्या तयारीत…

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रश्नावरून राजकारण रंगत असून, सत्ताधारी-विरोधकांमध्ये अनेक प्रश्नावरुन कलगीतुरा रंगताना पाहयला मिळत आहे. यावरुन विरोधक सातत्याने सरकारला जाब विचारताहेत. सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. मात्र विधिमंडळच्या अधिवेशनात सभागृहात विरोधक अनेक प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.

कोणते मुद्दे गाजणार…

यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, अकरावी प्रवेश प्रक्रिया घोळ, तिसरी भाषा, हिंदी सक्ती, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार, अवकाळीमुळं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मुंबईतील रेल्वे अपघात, पावसामुळे मुंबईची झालेली तुंबई, रस्ते, खड्डे, जुने पूल, गुन्हेगारी अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊन, सरकारला घेरण्याच्या शक्यता आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News