मुंबई शहरात मराठी माणसाला घर नाकारल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. अशा परिस्थितीत आता सरकारने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला घरे नाकारली जात असल्याचं बातम्या अनेकदा समोर येत आहेत. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होत असून मुंबई मराठी माणसाची असताना त्याच्यावर अन्याय होत आहे. याच संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. नेमका सरकारने काय निर्णय घेतला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…
मराठी माणसाला घर नाकारले तर…
“मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेल, अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावे, यासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल.” यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केले जाईल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

घर नाकारले तर बिल्डरवर कारवाई