आतातरी बडबड थांबवा अन्यथा तुमचा पक्ष रसातळाला जाईल, मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

गेली 35 वर्ष मी आमदार आहे. लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळं पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात येणार नाही. तुम्ही पक्ष रसातळाला नेऊन तुम्ही दलाली केला आहात. आणि दलालीचा विषय काढायचा तर गोरेगावमधील पत्राचाळीत कोणी दलाली केले हे सर्वांना माहित आहे.

Mumbai – संजय राऊत यांच्या सतत रोज सकाळी उठून त्यांचा भोंगा वाजत असतो. त्यांच्या बडबडीमुळे त्यांच्या पक्षात कोण राहत नाहीत. शिवसेना (ठाकरे) गटातील अनेक नेते आमच्या संर्पकात असून, राऊतांच्या बडबडीमुळे पक्ष रसातळाला जात आहे. पण आणखीन त्यांचा पक्ष जमीनदोस्त होईल. अशी टीका मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नाही. गिरीश महाजन हे भाजपाचे दलाल आहेत.

पक्ष संपवण्याची तुम्ही दलाली केली…

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन संजय राऊतांच्या टिकेवर बोलताना म्हणाले की, राऊतांच्या बडबडीमुळं त्यांच्या पक्षात त्यांचेच नेते नाराज आहेत. त्यामुळं पक्षातील लोकं त्यांना सोडून जाताहेत. संजय राऊत यांनी जर बडबड नाही थांबवली तर त्यांचा पक्ष जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही. शिवसेना संपविण्याचे काम, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊत तुम्ही केले. पक्षातील नेते राऊतांवर नाराज आहेत. उद्धवजी पण नाराज आहेत. म्हणून उद्धवजी संजय राऊत यांना आवर घाला…, नाहीतर तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ असो, सल्ला देत मंत्री महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला.

दुसऱ्या दुष्मनाची गरजच नाही…

संजय राऊतसारखी लोकं उबाठा गटात असताना दुसऱ्या कुठल्याही दुष्मनाची त्यांना गरजच नाही. त्यांचीच लोकं त्यांच्या पक्ष संपवण्यासाठी पुरेसे आहेत. आणि तेच काम संजय राऊत करत आहेत. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्ता एका विचाराने प्रेरित होऊन पक्षासाठी काम करत आहे. सत्ता असो किंवा नसो मी भाजपसाठीच काम करणार, मी कुठेही जाणार नाही, त्यांच्या पक्षातील फक्त सुधाकर बडगुजरच नाराज नाही आहेत, तर राज्यातील अनेक ठाकरे गटातील नेते आमच्या संपर्कात आहेत. असं महाजन म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News