विकसित भारताचा अमृत काळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला विकास आढावा

मोदीं पंतप्रधान झाल्यानंतर अनेक परदेशी दौरे केले. अजून ही करतात. विदेशात त्यांनी सामाजिक आणि राजकीय चांगले संबंध सुधारले, त्यामुळे जी-सेवन आंतरराष्ट्रीय परिषद होते. तिथे जर मोदी नसतील तर त्या परिषदेला महत्त्व नाही. मोदी यानी अनेक देशांशी संबंध सुधारलेत परकीय गुंतवणूक देशात आणलेले आहे.

Devendra Fadnavis – केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली. याबाबत राज्यात मागील अकरा वर्षात विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष पूर्ण झाली. 2014 रोजी केंद्रात भाजपाचे सरकार आले होते. यानंतर पुन्हा 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार आले आहे. दरम्यान, या अकरा वर्षात मोदी सरकारने सर्व समावेशक विकास केला. आणि तळागाळातील घटकातील… वंचित घटकातील न्याय दिला. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यावेळी ते बोलत होते..

सर्वाना न्याय देण्याचे काम…

गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने सर्वांना न्याय देण्याच काम केले आहे. कृषी व्यवसाय, उद्योग, औद्योगिकीकरण, विज्ञान, कला, क्रीडा सांस्कृतिक, परंपरा या सर्व क्षेत्रात मोदी सरकारने विकासाचे काम केलेले आहे. आणि या क्षेत्राला भरीव असा निधी दिला आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. काही वर्षांपूर्वी आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानी होती. परंतु आता आपण चौथ्या स्थानी आलेलो आहे. मोदी सरकार पंतप्रधान होण्याच्या आधी भारताची अर्थव्यवस्था ही फारशी चांगली नव्हती, अशी परिस्थिती होते. परंतु मोदी सरकारच्या मागच्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे. जीडीपीची परिस्थिती चांगली आहे. आगामी काळात तिसऱ्या स्थानी अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. आणि तो आपण करूच असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा यांचा विकास…

या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिले. आज मेट्रोचे जाळे उभारले आहे. अटल सेतू असो… कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, महाराष्ट्रातील मेट्रोचे प्रकल्प, पायाभूत सुविधा यासाठी मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला दिला,म्हणून आज महाराष्ट्राचा विकास झालेला आहे. पायाभूत सुविधा यांचा विकास झालेला आहे. त्यामुळे मोदींनीही महाराष्ट्राला भरभरून दिले. म्हणून आज महाराष्ट्र विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News