मुंबई – महाराष्ट्रात 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केलाय. याबाबत त्यांनी लिहिलेला एक सविस्तरच लेखच प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार विधानसभा निवडणुकीतही मॅचफिक्सिंग होणार, राहुल गांधींचा आरोप, तर आत्मपरीक्षण करा, असा सल्ला भाजपानं त्यांना दिलाय.
आगामी बिहारसह इतर राज्यांच्या निवडणुकांतही हे मॅचफिक्सिंग होईल, असा आरोपही राहुल गांधींच्या वतीनं करण्यात आलाय.

राहुल गांधींच्या लेखातील प्रमुख मुद्दे
1. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक विचित्र आणि अनाकलनीय
2. निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, सरन्यायाधीशांना हटवून केंद्रीय मंत्र्याचा समावेश
3. 2019 च्या निवडणुकीतील मतदारांची संखअया 8.98 कोटींवरुन पाच वर्षांत 9.70 कोटी, यातील 41 लाख मतदार पाच महिन्यांत वाढले
4. मतदान संपलं तेव्हा मतदानाची टक्केवारी 58.22 होती, ती दुसऱ्या दिवशी सकाळी 66.5 टक्के झआली. 7.83 टक्के मतदानाची अचानक वाढ
5. 85 विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त मतदान झाल्याचा संशय, कामटी मतदारसंघात भाजपाचे विधानसभेसाठीचे मतदान 56 हजारांनी वाढले.
6. यासगळ्या प्रकारात पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला. सीसीटीव्ही आणि इलेक्टॉनिक रेकॉर्ड जनतेपर्यंत पोहचू दिले नाहीत.
7. मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीत विषासमान
राहुल यांच्या भूमिकेचं ठाकरे शिवसेनेकडून समर्थन
राहुल गांधी यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर नेल्याचं सांगत, ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल यांच्या आरोपांचं समर्थन करण्यात आलंय. महायुतीनं हा विजय खेचला नाही तर चोरला, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले आमि ईव्हीएम मशीनशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. मोदी सरकार हे हुकूमशाही पद्धतीनं काम करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय.
जनता माफ करणार नाही- भाजपा
राहुलजी, 2009 मध्ये 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला बावनकुळेंनी काँग्रेस आणि मविआला दिलाय.
भाजपाने आरोप फेटाळले
1. महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे, असं राहुल गांधी सांगतात. मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते
2. 2009 साली काँग्रेसचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.
3. आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करण्याचं काम.
4. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.
वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपानं दिलीय.