Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, पालखीचा प्रवास कसा असणार?

पालखी मार्गावरील पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सेवा, अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे नियोजन याची जय्यत तयारी झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जूनला होणार असून, 5 जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यामुळे माऊलींच्या पालखीची ओढ भक्तांना लागली आहे.

Pune Palkhi 2025 : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जाते. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. पंढरपूरची वारी हे भक्तांसाठी एक पर्वणी असते. वारी करण म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक होणे, अशी भावना भक्तामध्ये आहे. दरम्यान, आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध विठ्ठल भक्तांना लागले आहेत. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या सामील होत असतात. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे.

परतीचा प्रवास पंढरपूर ते आळंदी…

दरम्यान, आषाढीच्या वारीत संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालखी असतात. तर आता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 जूनला पुणे जिल्ह्यात दाखल होणार, अशी माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गात माऊलींच्या पादुकांना निरास्नान, माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण, गोल रिंगण, तिसरे आणि चौथे गोल रिंगण असा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

6 जुलै आषाढी एकादशी आहे. या दिवशी पादुका पूजन आणि माऊलींच्या पालखीचे पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा होईल. नंतर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदी स्नान घालण्यात येईल. शेवटी माऊलींची पालखी 10 जुलै रोजी गोपाळकाला झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवासाला लागणार आहे. पंढरपूर ते आळंदी असा करणार आहे. तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये पालखी 21 जुलै रोजी पोहचणार आहे

कसा असणार माऊलींच्या पालखीचा मार्ग?

– 20 जूनला पुणे जिल्ह्यात दाखल
– 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान
– 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ
– 25 तारखेला पालखी वाल्हे येथे माऊलींच्या पादुकांना निरास्नान
– 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण
– 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण
– 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण
– 3 जुलै रोजी वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण
– 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल
– 5 जुलै रोजी पालखी वाखरी येथे मुक्कामी
– 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल


About Author

Astha Sutar

Other Latest News