मुंबईमध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. खरेतर, मान्सूनचे ठरलेल्या वेळेपेक्षा १५ दिवस आधीच आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत असे ७५ वर्षांत प्रथमच झाले आहे.
मुंबईत मान्सून येण्याची तारीख ११ जून सांगण्यात आली होती, पण त्याच्या आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे.

दोन दिवस हवामान असेच राहणार
दरम्यान, आयएमडी पुणेकडून सांगण्यात आले आहे की, “मुंबई, पुणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह महाराष्ट्रात मान्सून आधीच दाखल झाला आहे. मान्सून रेषा मुंबईपासून पूर्वेकडे पुणे आणि सोलापूरमार्गे पसरते. पुढील दोन दिवस हवामानाची अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर तीव्रता थोडी कमी होऊ शकते. कोकण आणि गोव्यातील बहुतेक जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत आणि घाटमाथ्यावरही पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट राहील.”
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
तसेच, हवामान विभागाने मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
Pune, Maharashtra: Head of the Pune Division of the India Meteorological Department (IMD) S.D. Sanap says, “The monsoon has already arrived in Maharashtra, including Mumbai, Pune, and parts of central Maharashtra. This is confirmed monsoonal rainfall. The monsoon line extends… pic.twitter.com/vFbAzQtz0z
— IANS (@ians_india) May 26, 2025
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाने जागरूक राहावे आणि नागरिकांच्या सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी गरज निर्माण झाली आहे.