रविवारचा दिवस मुसळधार पावसाचा, राज्यातील 17 जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अलर्ट

मुंबई, मुंबई उपनगरात, ठाणे, पालघर, रायगड आदी ठिकाणी ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Sunday Rain – मे महिन्यात अंतिम आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहेत. या महिन्यात सरासरीपेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. मात्र गेल्या आ़वड्यापासून पाऊस सातत्याने बरसत नाही. अधूनमधून पाऊस बरसत आहे. मात्र आज राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून, १७ जिलह्यामध्ये हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट…

दरम्यान, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत पुढील काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरणासह आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्याना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता…

दुसरीकडे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी ८ जून रोजी रविवारी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरीला 8 जूनसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजाच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच रविवारी दिवसभर आकाश ढगाळ राहिल आणि जोरदार पाऊस पडेल, असं हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News