राज्यातील नागरिकांची चिंता वाढणार; कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, धोका किती?

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे या भागात हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात स्थिती सध्या नियंत्रणात आहे.

राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या नक्कीच चिंता वाढवणारी आहे, काल दिवसभरात आढळलेल्या 43 नव्या रुग्णांपैकी 35 मुंबईतील, तर 8 पुण्यातील आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांमध्ये रुग्णसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे, मुंबईतच आतापर्यंत 248 प्रकरणं नोंदली गेली आहेत. ठाण्यातील एका तरुणाच्या मृत्यूनंतर आतापर्यंत कोणताही नवीन मृत्यू झालेला नाही. मात्र एकट्या मे महिन्यात तब्बल 242 रुग्ण आढळले, तर जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 300 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासोबत कर्नाटकात देखील रूग्णसंख्येत वाढ नोंदवली जात आहे.

मुंबई, पुणेकरांना धास्ती

मुंबई-पुण्यात रुग्णसंख्या चिंताजनक स्वरूप धारण करत आहे. राज्यात आढळलेल्या 43 नव्या रुग्णांपैकी 35 मुंबईतील, तर 8 पुण्यातील आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांमध्ये रुग्णसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे, मुंबईतच आतापर्यंत 248 प्रकरणं नोंदली गेली असून, ही राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या 82.67 टक्के इतकी आहे. ही बाब मुंबई आणि पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

ठाणे, डोंबिवलीत रूग्ण वाढले

आतापर्यंत ठाण्यातील बाधितांची संख्या ३० वर गेली आहे. यामध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांना कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच, एका गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले की, बाधित डॉक्टरांची प्रकृती चांगली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणत्याही व्यक्तीमध्ये लक्षणे दिसून आल्यासच त्यांना विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जातं. रविवारी डोंबिवली येथूनही एक रुग्ण ठाण्यात दाखल झाला आहे. याशिवाय एका बाधित गर्भवतीवर उपचार सुरू आहे.

राज्यात काय स्थिती?

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या 209 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 300 रुग्ण आढळले असून, यातील 80 टक्के रुग्ण केवळ मे महिन्यातच आढळले आहेत. राज्यातील नागरिकांना आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं एक प्रकरण अलीकडेच ठाण्यामध्ये समोर आले आहे. त्यानंतर मृत्यूचा प्रकार घडलेला नाही, ज्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी अशाच लोकांना अधिक धोका संभवतो.


About Author

Rohit Shinde

Other Latest News