आजच्या धावपळीच्या जीवनात आनंद हा एका अमूल्य खजिन्यापेक्षा कमी नाही. चेहऱ्यावर हास्य आणि हृदयात शांती, या अशा गोष्टी आहेत ज्यांची किंमत मोजता येत नाही. हे खरे आहे की आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तणावात असतो. नोकरी, परीक्षा किंवा कुटुंबाच्या चिंता, हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. पण, जर हा ताण बराच काळ टिकला आणि त्याचा आपल्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला तर ही चिंतेची बाब आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. विशेषतः महिलांवर याचा जास्त परिणाम होतो. नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणींना पुरूषांपेक्षा जास्त ताण येतो.
महिलांना जास्त ताण का येतो हे जाणून घ्या?

अनियमित मासिक पाळी
महिलांना जास्त ताण येण्याची अनेक कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनियमित मासिक पाळी देखील एक कारण असू शकते. अनियमित मासिक पाळी म्हणजे मासिक पाळी नियमित वेळेवर न येणे किंवा मासिक पाळीच्या कालावधीमध्ये बदल होणे. अनेकदा, तणाव, हार्मोन्समध्ये बदल, वजन, झोप आणि आहार यांसारख्या घटकांचा मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.तणावामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
पुरळ आणि मुरुम
तणावामुळे केस गळणे
महिलांनी तणाव कसा टाळावा?
महिलांनी तणाव टाळण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेसी झोप, संतुलित आहार, आणि तणाव कमी करण्यासाठी विश्रांती करणे आवश्यक आहे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवल्यास तणाव कमी होऊ शकतो. फळे, भाज्या आणि प्रथिने युक्त आहार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर निरोगी राहील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)