पावसाळा सुरू होताच विविध संसर्ग आणि आजार डोकं वर काडू लागतात. जागोजागी साठलेले पाणी, कचरा, दूषित पाणी, हवा यामुळे आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्याच्या ऋतूत डेंग्यूचा धोकाही वाढतो. हा आजार डासांमुळे पसरतो. या आजाराची कोणती लक्षणे आहेत? त्यावर कोणते उपचार घेतले पाहिजे, यावर सविस्तर जाणून घेऊया…
डेंग्यूचा प्रसार कधी होतो?
डेंग्यूचा प्रसार डासांमुळे होतो, हा रोग पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात जास्त प्रमाणात पसरतो, कारण त्यावेळी डासांची पैदास जास्त होते. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात, साठलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. पावसाळ्यात डबकी साचतात, पाणी तुंबते, सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे या अळ्यांना जन्मास एकदम अनुकू वातावरण मिळते.

डेंग्यूची लक्षणे काय आहेत?
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढतो, कारण डासांची संख्या वाढते. डेंग्यूची मुख्य लक्षणे म्हणजे अचानक ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या. काही प्रकरणांमध्ये, त्वचेवर पुरळ किंवा रक्ताच्या उलट्या देखील होऊ शकतात. डेंग्यूचा प्रभाव 3 ते 9 दिवस शरीरात राहतो. यामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि शरीरातील प्लेटलेट्समध्ये सतत घट होत असते. या लक्षणाबाबत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
डेंग्यूपासून असा बचाव करा
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता असते. डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे, डासांची उत्पत्ती थांबवणे आणि डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करणे महत्त्वाचे आहे.
- घराच्या आसपास पाणी साठू देऊ नका. टायर, बादल्या, कुंड्या आणि इतर ठिकाणी पाणी जमा झाल्यास ते काढून टाका.
- डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घरातील स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी.
- कूलर वापरत असल्यास त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे.
- डास प्रतिबंधक क्रीम, स्प्रे, किंवा कॉईल वापरा.
- घराच्या आजूबाजूला अस्वच्छ वस्तू ठेवू नका.
- डासांपासून दूर राहण्यासाठी घराच्या दारात-खिडक्यांना जाळ्या लावा.
- तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, गरज पडल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)