‘पंचायत’ला टक्कर देणारी वेब सीरीज आली, ‘ग्राम चिकित्सालय’ची तुफान चर्चा

पंचायत आणि ग्राम चिकित्सालय या दोन्ही सिरीज दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. मात्र, या दोन्ही सिरीजच्या कास्टपासून ते कथानकापर्यंत सर्व काही खूप वेगळे आहे. पंचायत जशी एका गावातील सचिवाच्या दृष्टिकोनातून गावाच्या राजकारणावर आधारित आहे, तशीच ग्राम चिकित्सालय ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर आधारित सिरीज आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर एका नव्या वेब सीरीजने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ही सीरीज पंचायत’ प्रमाणेच गावातील स्थानिक समस्या आणि राजकारणावर भाष्य करते. ग्राम चिकित्साचीलय असे या वेब सीरीजचे नाव आहे.

अमोल पाराशर आणि विनय पाठक यांच्या ग्राम चिकित्सालय हा शोचा प्रीमियर ९ मे रोजी झाला. ‘पंचायत’चे निर्मातेच या मालिकेचेदेखील निर्माते आहेत आणि यामध्येही गावाची कथा मांडण्यात आली आहे, जी जितेंद्र कुमार याच्या ‘पंचायत’शी साधर्म्य साधणारी आहे.

ग्रामीण कथा, उत्तम व्यक्तिरेखा आणि गावच्या जीवनात रुळणाऱ्या एका विश्वासार्ह डॉक्टरवर आधारित ही मालिका ‘पंचायत’ची झलक दाखवण्याचा प्रयत्न करते.

पण तरीही, स्वतःची एक वेगळी कथा असल्याने ग्राम चिकित्सालय ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पंचायत’चे चाहते या मालिकेला बऱ्याच अंशी तशीच समजतील. टीव्हीएफची पंचायत मालिका सर्वत्र गाजली. पण ग्राम चिकित्सालय मात्र पंचायतसारखा प्रभाव निर्माण करू शकली नाही.

ग्राम चिकित्सालय आणि पंचायत यांच्यातील साम्य

या कलाकारांनी आणली रंगत-
पंचायतमध्ये प्रह्लाद चाचा आणि विकास हे दोघे सचिवजींना ठाम पाठिंबा देतात. त्याचप्रमाणे, ग्राम चिकित्सालयमध्ये फूटानीजी (आनंदेश्वर द्विवेदी) आणि गोविंद (आकाश मखीजा) हे त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वासह महत्त्वाची भूमिका बजावतात.
फूटानीजींना काम करण्यापेक्षा गप्पा मारणे आणि तंबाखू खाणे अधिक आवडते, तर गोविंद मात्र क्लिनिकमध्ये उत्साहाने आणि मनापासून काम करतो.

 सीरीजमधील सामाजिक मुद्दे-

दोन्ही वेब सीरीज ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि प्रशासनातील त्रुटी व वास्तव यांवर आधारित आहेत. निर्मात्यांनी कथा आणि पात्रांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनातील अडचणी प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत.

ग्रामीण कथा-
या दोन्ही सीरीजध्ये छोट्या गावांची पार्श्वभूमी आहे, जी ग्रामीण जीवनशैली आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आव्हानांची झलक प्रेक्षकांना दाखवते.

लव्ह अँगल-
पंचायतमध्ये सचिवजी आणि रिंकी यांच्यात हळूहळू वाढणाऱ्या प्रेमा रोमँटिक अँगल दाखवण्यात आला आहे. तर ग्राम चिकित्सालयमध्ये डॉ. प्रभात (अमोल पाराशर) आणि डॉ. गार्गी (आकांक्षा रंजन कपूर) यांच्यातही काही रोमँटिक दृश्ये पाहायला मिळतात.

शहरातील मुख्य पात्र, गावात रमण्याचा प्रयत्न करतो-
या दोन्ही शोमध्ये मुख्य पात्र ग्राम चिकित्सालयमधील डॉ. प्रभात आणि पंचायतमधील अभिषेक हे गावाबाहेरचे आहेत, ते शहरातून येऊन गावातील जीवनात सामावून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते स्थानिक रूढी-परंपरा स्वीकारण्याचा आणि त्यांच्यात मिसळण्याचा संघर्ष करतानाही दिसतात.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News