कोलकाता लॉ कॉलेजमध्ये तरूणीवर सामूहिक अत्याचार; महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर!

कोलकाताच्या लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर कॉलेजध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

कोलकाता अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलं आहे. कोलकाताच्या लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर कॉलेजध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेमुळे कोलकात शहरात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

घटनेतील आरोपींना अटक

या घटनेतील पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील 3 आरोपींपैकी 1 आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींमध्ये दोन कॉलेजमध्ये शिकानरे व एक माजी विद्यार्थी याचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणातील पिडीतेने घटनाक्रम सांगितलं आहे.

जबाबात पीडिता म्हणाली,’ त्यांनी कॉलेजचे मुख्य द्वार बंद केले. सुरक्षारक्षक असहाय्य होता, त्याने माझी मदत केली नाही. त्यांनी मला जबरदस्ती गार्ड केबिनमध्ये नेले. त्यांनी माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. मला त्यांनी ब्लॅकमेल केले. माझ्या मित्राला मारण्याची धमकी दिली आणि पालकांना अटक करतील अशी धमकी दिली.’

महिला सुरक्षेच काय?

कोलकातामध्ये घडलेला बलात्काराचा प्रकार हा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील अत्याचार हे समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. महिलांना स्वातंत्र्याने आणि भीतीविना जगता यावे यासाठी कडक कायदे, जलद न्याय आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.

पोलिस यंत्रणेने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. समाजानेही मानसिकता बदलावी लागेल. महिला ही केवळ अबला नसून सक्षम व्यक्ती आहे, हे मान्य करणे काळाची गरज आहे. अशा घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण होतं, जे रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News