मुंबई-चेन्नई 5, कोलकाता 3… आणि आतापर्यंत कोणत्या संघानं किती वेळा जिंकलं IPL विजतेपद? संपूर्ण यादी

आरसीबी व पंजाब किंग्ज यांच्यात संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.

IPL Winners List : 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला सुरुवात झाली. तेव्हापासून या स्पर्धेला क्रिकेट चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. काही संघांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. दरवर्षी एक नवीन संघ विजेता म्हणून उदयास येतो, तर आयपीएलच्या 18 व्या हंगामात पंजाबचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी व पंजाब किंग्ज यांच्यात संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. पाहूया आतापर्यंत कोणत्या संघाने किती वेळा IPL विजतेपद पटकावलं आहे.

मुंबई-चेन्नई 5 वेळा तर केकेआर…

दरम्यान, 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला सुरुवात झाली. तेव्हापासून ही स्पर्धा अतिशय रंजक झाली आहे. मुंबई सहावेळा अंतिम सामन्यात धडक मारली. त्यापैकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय चार वेळा फायनल खेळलेल्या केकेआर संघानं तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 10 पैकी पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि पाच वेळा उपविजेतेपद मिळवलं आहे. आरसीबी संघानंही 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजेतेपद जिंकता आलेलं नव्हत. मात्र यावर्षी पहिल्यांदाच आरसीबी IPL विजतेपद पटकावलं आहे.

खेळाडूंसाठी मोठा प्लटफॉर्म…

स्पर्धेच्या इतिहासत चेन्नई सुपर किंग्जनं सर्वाधिक वेळा (10) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्सनं सहा वेळा आणि केकेआरनं 4 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. ही अशी स्पर्धा आहे ज्यानं त्या खेळाडूंना रातोरात चमकवलं ज्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. इतकंच नाही तर या स्पर्धेत अशा अज्ञात खेळाडूंनाही परत आणलं ज्यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं असेल किंवा ज्यांची कारकीर्द ठप्प झाली असेल. त्यांना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळं ही स्पर्धा खेळाडूंसाठी मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News