मुंबई: सोमवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि मुंबई इंडियन्समध्ये महत्वपूर्ण सामना पार पडला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळूरूला अंतिम टप्प्यात 12 धावांनी विजय मिळाला. यामुळे मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या मोसमात बराच मागे पडलाय, तर दुसरीकडे बंगळूरूचा संघ मजबूत स्थितीत पोहोचलाय. कृणाल पंड्या, विराट कोहली आणि रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
सुरूवातीला प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली 67, रजत पाटीदार 64 या धावांच्या जोरावर बंगळूरूने 222 धावांचे तगडे आव्हान मुंबईसमोर उभे केले होते. या आव्हानाचा सामना करताना मुंबई संघाच्या खेळाडूंनीही कौशल्य पणाला लावले.

आरसीबीने दिलेल्या 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्संस घाची सुरूवात पुन्हा एकदा फारशी चांगली झाली नाही रोहित शर्मा 9 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार लगावत 17 धावा करून बाद झाला. तर काही वेळाने रायन रिकल्टनही 17 धावा करत पायचीत झाला. धावा काढण्यासाठी झगडत असलेला विल जॅक्स २२ धावा करत बाद झाला. तर सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर 28 धावा करत बाद झाला. तिलक वर्मा देखील फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.
हार्दिक पंड्याने वादळी फलंदाजी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या भागीदारीने सामना मुंबईच्या बाजूने वळवला होता. पण मुंबईचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या जवळ येऊन सामना जिंकू शकला नाही. हार्दीक पंड्या 42 धावांवर बाद झाला.
अखेरच्या षटकात काय घडलं?
मुंबईलाा विजयासाठी अखेरच्या षटकात 19 धावांची गरज होती. कर्णधार रजत पाटीदारने कृणाल पंड्याला गोलंदाजी दिली. कृणालने पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतले. परिणामी मुंबईच्या हातातून सामना निसटला.
आरसीबीचे गोलंदाज चमकले
आरसीबीच्या गोलंदाजांनी वानखेडेच्या मैदानावर शानदार गोलंदाजी करत मुंबईला विजयापासून रोखले. कृणाल पंड्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि जोश हेझलवुजने 2-2 विकेट तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली. सुयश शर्माला विकेट मिळाली नसली तरी त्याने चांगली गोलंदाजी केली.मुंबई इंडियन्स वि. आरसीबी यांच्यात एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.