या ४ शिलेदारांनी मागील वर्षीही आयपीएल फायनल खेळली, त्याच खेळाडूंनी वेळी RCB चं नशीब पालटलं

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) ने २९ मे रोजी खेळलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेटांनी पराभूत केले आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. या हंगामात RCB चे मैदानावरील प्रदर्शन अत्यंत प्रभावी राहिले असून त्यांनी लीग स्टेजमध्ये घराबाहेर खेळलेले सर्व ७ सामने जिंकले आहेत.

हे ४ खेळाडू सलग दुसऱ्या वर्षी फायनल खेळणार

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावानंतर RCB च्या स्क्वाडमध्ये विशेषतः त्यांच्या गोलंदाजी युनिटबाबत चर्चा रंगली होती. मात्र संघाच्या सुसंगत आणि प्रभावी कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. यंदाच्या हंगामात RCB साठी खेळणारे भुवनेश्वर कुमार, फिल साल्ट, मयंक अग्रवाल आणि सुयश शर्मा हे ४ खेळाडू असे आहेत, जे मागील हंगामातील अंतिम सामन्यातही सहभागी होते.

२०२४ मध्ये केकेआरने जिंकली फायनल

आयपीएल २०२४ ची फायनल कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झाली होती. त्या सामन्यात फिल साल्ट आणि सुयश शर्मा हे KKR चा भाग होते, तर भुवनेश्वर कुमार आणि मयंक अग्रवाल SRH कडून खेळले होते. त्या सामन्यात केकेआरने हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

भुवनेश्वर ते सुयश शर्मा, या चौघांनी छाप पाडली

RCB ने आयपीएल २०२५ हंगामासाठी या चारही खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतलेला निर्णय योग्य ठरला. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने १५ सामन्यांत १३ बळी घेतले आणि संघासाठी सातत्याने योगदान दिले. दुसरीकडे, सुयश शर्माने क्वालिफायर-१ सामन्यात गोलंदाजीत चमकदार प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

फलंदाजीत फिल साल्टने ओपनर म्हणून संघाला प्रत्येक सामन्यात आक्रमक सुरुवात करून दिली. तर हंगामाच्या मध्यात देवदत्त पडिक्कलच्या जागी संघात आलेल्या मयंक अग्रवालने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात महत्त्वाची खेळी करत RCB ला टॉप-2 स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News