IPL फायनलमध्ये सर्वांच्या नजरा या 5 खेळाडूंवर असतील, एकट्याच्या बळावर सामना फिरवतात

अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या अंतिम लढतीपूर्वी अशा 5 खेळाडूंवर सर्वांची नजर राहणार आहे, ज्यांच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत.

IPL 2025 FINAL : आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून झाली होती, आणि आता सुमारे अडीच महिन्यांच्या थरारानंतर अंतिम सामन्याचा दिवस आला आहे. लीग टप्पा आणि प्लेऑफच्या आव्हानांना पार करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांनी अंतिम लढतीत प्रवेश केला आहे.

अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या अंतिम लढतीपूर्वी अशा 5 खेळाडूंवर सर्वांची नजर राहणार आहे, ज्यांच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत.

1) विराट कोहली

पहिलं नाव अर्थातच विराट कोहलीचं आहे, ज्यांना अंतिम सामन्यांमधील दबावाच्या परिस्थितीत धावा करण्याची विशेष आवड आहे. उदाहरणच घ्या 2024 च्या टी20 वर्ल्ड कपचं, जिथे विराट संपूर्ण स्पर्धेत शांत होता, पण अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी करून भारताला विजेतेपद मिळवून दिलं होतं. आयपीएल 2025 मध्ये कोहलीने आत्तापर्यंत 614 धावा केल्या असून, अंतिम सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याची त्याच्यात पूर्ण ताकद आहे.

2) श्रेयस अय्यर

पंजाब किंग्सच्या अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर श्रेयस अय्यर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अय्यरने आतापर्यंत या स्पर्धेत 603 धावा केल्या असून, क्वालिफायर-2 मध्ये त्याने केलेल्या 87 धावांच्या शानदार खेळीमुळेच पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. सोबतच, त्याची कप्तानी आणि निर्णयक्षमता सामना पलटवण्याची ताकद ठेवते.

3) जोश हेजलवुड

आरसीबीच्या यशामागे जोश हेजलवुडचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर 11 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. क्वालिफायर-1 मध्ये त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

4) अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग गेल्या काही वर्षांत भारताच्या अव्वल टी20 गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. या हंगामात त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेटही कमी आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असणं पंजाबसाठी एक मोठं फायदेशीर ठरत आहे. आता तो RCB विरुद्ध क्वालिफायर-1 मधील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत असेल.

5) जितेश शर्मा

जितेश शर्मा भलेच IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये नसले, तरी त्यांची खेळी निर्णायक ठरत आहे. त्यांनी आतापर्यंत 14 सामन्यांत 237 धावा केल्या आहेत. मात्र, शेवटच्या लीग सामन्यात LSG विरुद्ध त्यांनी जेवढं तडाखेबाज प्रदर्शन केलं, ते पाहून स्पष्ट होतं की ते अशाच आक्रमक खेळासाठी उत्सुक आहेत. त्यांनी लखनऊविरुद्ध फक्त 33 चेंडूत 85 धावा फटकावल्या होत्या. अशा आणखी एका खेळीतून ते पंजाब किंग्ससाठी सामना फिरवणारा खेळाडू ठरू शकतात.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News